नगर : राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. काही ठिकाणी तापमान ४.५ ते ५ अंशावरती पोहोचलं आहे. तर पुढील काही दिवस थंडीची लाट (Cold wave) कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे चित्र सध्या बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. आज राज्यात नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. थंडीचा काहीसा परिणाम मतदारांवर देखील पडल्याचे दिसून आलं आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद मिळणार का? राजकीय चर्चांना उधाण
अहिल्यानगरचे तापमान काय ? (Ahilyanagar Weather Update)
अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक,निफाड सह तापमानाचा पारा घसरला असून नागरिकांना थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. या मोसमातील नीच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे. अहिल्यानगरमध्ये आज कमाल ३०.२ अंश सेल्सिअस तर किमान ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सरासरी १८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. नाशिकमध्ये ६.९ अंश तर निफाडमध्ये ४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी!माणिकराव कोकाटेंना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे परिसरात थंडीची लाट (Ahilyanagar Weather Update)

अहिल्यानगरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर गारठा कायम आहे. पुणे परिसरात थंडीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८.३ अंशांपर्यंत पारा घसरला आहे. आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता असून कमाल तापमान २९ आणि किमान ८ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पाषाण परिसरात ८, लोहगाव १३, चिंचवड १४, मगरपट्टा १५ आणि कोरेगाव पार्क परिसरात किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही मोठे बदल जाणवणार नाहीत. तर किमान तापमानात देखील पुढील ७ दिवस सध्याचीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.



