Ahmednagar : अहमदनगर शहराच्या नामांतरणामुळे राहुरीत जल्लोष

Ahmednagar

0
Ahmednagar

Ahmednagar : राहुरी : मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराबाबत निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. या निर्णयामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला.

नक्की वाचा : प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही – पंकजा मुंडे

हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा

फटाके फोडत, पेढे वाटप करून निर्णयाचे स्वागत


अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होवून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर, दत्तात्रय खेडेकर, ज्ञानेश्‍वर बाचकर, सचिन डफळ, राजेंद्र तागड, अ‍ॅड. अक्षय भांड, विनोद पाचारणे, बापुसाहेब बाचकर, निशांत दातीर, अशोकराव कोळेकर, किरण थोरात, पत्रकार सुनिल नजन, सचिन कोळपे, जगन्नाथ तात्या गावडे, शंकर खेमनर, किरण थोरात, इंद्रजित खेमनर, अमोल खेमनर, भागाजी गावडे, राजूमामा तागड आदींसह हिंदू समाज बांधवांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने मागील वर्षी संपूर्ण नगर जिल्ह्यात नामांतर यात्रा काढण्यात आली होती. सुमारे १५ दिवस चाललेल्या या यात्रेत राहुरी, नगर, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगांव, राहाता, संगमनेर, अकोले असा सुमारे १ हजार किलो मीटरचा प्रवास करून प्रत्येक तालुक्यातील गावागावातील ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना यांनी नामांतरणासाठी केलेले सुमारे १ हजार १०० ठराव जमा करून सदरील ठराव हे शासनाच्या विविध विभागांना पाठविण्यात आले. अखेर या कृती समितीला यश आले असून काल मंत्रीमंडाळच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतरणा बाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरील निर्णयाचे नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी येथील अहिल्याभवन येथे अहिल्या देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर फटाके फोडत, पेढे वाटप करून राज्य सरकारच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नक्की वाचा : नगरच्या विकासासाठी अजित पवारांनी संग्राम जगतापांना दिले ९४ कोटीचे बंपर गिफ्ट

अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव (Ahmednagar)


 यावेळी अलका तमनर, वडीतके भाऊसाहेब, प्रा. गडधे, दादाभाऊ तमनर, पोपट शेंडगे, वसंत पाटोळे, कैलास केसकर, महेश तमनर, भारत मतकर, सुजित तमनर, अनिस शेख, दर्शन खेडेकर, श्रीकांत खेमनर, कोंडीराम बाचकर, सुरज विटनोर, गौतम गाडे, योगेश लबडे, तमनर पेंटर, भागवत झडे, अनिल डोलनर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीचे जन्मगाव असलेल्या जिल्ह्याला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर नाव देवून अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा व भविष्यात युवकांना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे मत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीचे विजय तमनर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here