Air India Plane Crash: विमानाबाहेरील ‘त्या’ ३३ मृतांच्या कुटुंबियांनाही मिळणार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत

0
Air India Plane Crash:विमानाबाहेरील 'त्या' ३३ मृतांच्या कुटुंबियांनाही मिळणार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत
Air India Plane Crash:विमानाबाहेरील 'त्या' ३३ मृतांच्या कुटुंबियांनाही मिळणार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत

नगर : अहमदाबादहुन लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या झालेल्या विमान दुर्घटनेत (Air India Plane Crash) २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्या नागरी वस्तीत हे विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. आता विमानाबाहेरील ज्या व्यक्तींचा दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांनाही १ कोटीची मदत (1 crore assistance) दिली जाणार असल्याचे टाटा ग्रुपने (Tata Group) जाहीर केले आहे.

टाटा ग्रुपने दिलेल्या निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून केला जाणार आहे. जखमींना मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?;वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल  

विमान अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे नुकसान (Air India Plane Crash)

एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याशिवाय या विमान अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. या इमारतीचे बांधकाम करुन देण्याचेही आश्वासन टाटा ग्रुपने दिले आहे.

अवश्य वाचा : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

एकूण २७४ जणांचा मृत्यू (Air India Plane Crash)

एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. तसेच विमान कोसळल्यानंतर बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या ३३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्थिक भरपाईव्यतिरिक्त नातेवाईकांना नोकरी देण्यासंबंधी काही निर्णय घेतला जाईल का ? असाही प्रश्न टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता. यावर अधिकारी म्हणाले की, सध्या याबाबत काही निर्णय झालेला नाही. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असून चौकशी सुरू असल्याच त्यांनी सांगितलं आहे.