Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी १ कोटींची मदत;वसतिगृह देखील बांधणार

0
Air India Plane Crash:टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत;वसतिगृह देखील बांधणार
Air India Plane Crash:टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत;वसतिगृह देखील बांधणार

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत (ahmedabad plane crash) एअर इंडियाच्या (Air india) बोईंग १७१ फ्लाईटमधील २४१ प्रवाशांचा मृत्यू (241 passengers died) झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात १ प्रवासी बचावला आहे. या दुर्दैवी घटनेने देश शोकसागरात बुडाला असून २४१ प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने (Tata) घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नक्की वाचा : राज्यात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस;मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा    

‘टाटा ग्रुप बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करणार’ (Air India Plane Crash)

जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल,असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तसेच विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन.चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.

टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ”एअर इंडिया फ्लाइट १७१ मधील दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या क्षणाच्या आमच्या दु:खद भावना शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या आहेत. विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबीयांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासोबत आमच्या प्रार्थना आहेत,असं म्हणत या पत्रकातून जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : ‘काश्मीरने रडवले होते,आता बंगाल घाबरवेल’;‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित!

‘बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार’ (Air India Plane Crash)

एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे आहे. त्यामुळे आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली. दुर्घटनेचे नेमकं कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेस देखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार असल्याची माहिती आहे.