Ajit Pawar:’ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही’-अजित पवार 

0
Ajit Pawar:'ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही'-अजित पवार 
Ajit Pawar:'ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही'-अजित पवार 

Ajit Pawar : ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही, मी काय सांधु संत नाही, हाडामासाचा माणूस आहे. आता मेहरबानी करा, सगळीकडे देशात विकासाचे काम सुरू आहेत, सोयाबीनला, कापसाला भाव चांगला द्यायचा आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीचं सरकार निवडून आणा, सरकारने घोषणा केलेल्या सगळ्या भावंडाच्या, माय माऊलीच्या, बहिणींच्या योजना चालू राहील असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमरावतीकरांना (Amravati) आवाहन केलं आहे.  

नक्की वाचा : रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध सुरु! हल्ल्यात अनेकजण जखमी

‘सगळे सोंग करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही’ (Ajit Pawar)

अजित पवार पुढे म्हणाले की, आज कित्येक लोकांना शेतीमधलं काही माहिती नाही आणि ते शेतकर्‍यांच्या बाता मारताय. मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, त्यामुळे मला शेतकर्‍यांच्या वेदना माहित आहेत. सगळे सोंग करता येतात. मात्र, पैशाचे सोंग करता येत नाही. आपण सरकारमध्ये असल्याने आपण हे प्रत्यक्ष पैसे देऊन दाखवून दिलेले आहे. महिला व बाल रुग्णालयासाठी बारा कोटी रुपयांची सहा एकर जमीन दान देणाऱ्या विजय वडास्कार यांचे मी अभिनंदन करतो. मी तुमच्या मतदारसंघात ४००० कोटीचा निधी दिलाय. त्यामुळे पुन्हा देवेंद्र भुयार यांना संधी द्या, वरुड मोर्शी मतदारसंघात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हा अजित पवारांचा शब्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अवश्य वाचा : ‘उदे गं अंबे’ मालिकेतून उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा; मालिकेतुन ‘या अभिनेत्याचे कमबॅक

‘मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते बिल माझ्यावर सोडा’ (Ajit Pawar)

पवार पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत घटना बदलणार, संविधान बदलणार, असा अपप्रचार करण्यात आला. त्याला मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाज बळी पडला. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचे आहे. सत्ता येत राहील, जाता राहील. माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे. म्हणून सर्व मुलींची फीस भरण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर, ज्या गरीब मुली  शिकू शकत नाही, त्यांनी ५०% शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केलीय आणि विरोधक ओरडतात की सरकारने नको त्या योजना आणल्या.

विरोधक लाडकी बहीण योजनेवरून टिंगल करायला लागलेत, भावासाठी काय आणणार? ४४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इथूनपुढे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बिल भरावे लागणार नाही. मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते वीज बिल माझ्यावर सोडून द्या, असे आश्वासन देत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

आतापर्यंत अमरावती पाच वर्षाच्या आधी किती काम झाली हे तपासा आणि आता या पाच वर्षात  ४३७१ कोटी रुपयांचा विकास या मतदारसंघात झालंय ते तपासा. मला या मतदार संघातील महिलांनी राखी बांधली. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here