
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी अत्यंत दुःखद घटना आज (ता.२८) घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचं बारामती विमानतळाजवळ (Baramati Airport) झालेल्या विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) निधन झाले. ते बारामतीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान हे लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच हे विमान लँड होण्यासाठी अवघे ४५ सेकंद बाकी असताना या विमानाचा अपघात झाला आहे.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
अजित पवारांची राजकीय कारकीर्द कशी ? (Ajit Pawar Plane Crash)
अगदी धडाडीचे नेते म्हणून अजित पवारांची देशभरात ओळख होती.अजित पवारांची राजकीय कारकीर्द मात्र वाखाणण्याजोगी राहिली.अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. बी.कॉम झालेल्या अजित पवारांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला. ते लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड आणि झटपट निर्णयक्षमता यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अजित पवारांची राजकीय कारकीर्द ही चढ-उतारांनी भरलेली, पण तितकीच प्रभावी ठरलेली होती.
अवश्य वाचा: अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ची प्रेक्षकांना सांगीतिक भेट;’नक्षत्रांचे देणे’ गाणे प्रदर्शित
१९८२ साली स्थानिक राजकारणातून राजकारणाची सुरवात (Ajit Pawar Plane Crash)
भल्या पहाटे कामाला सुरुवात करणारा, फाईल्सवर थेट निर्णय घेणारा आणि कठोर प्रशासक अशी अजित पवारांची प्रतिमा होती.अजित पवार यांनी १९८२ साली स्थानिक राजकारणातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. बारामती परिसरात त्यांनी संघटनात्मक बांधणी करत जनतेशी थेट संपर्क साधला. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि खासदार म्हणून संसदेत पोहोचले. या टप्प्यावरच त्यांची ओळख एक आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी झाली.१९९३ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी जलसंपदा, अर्थ, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळत प्रशासनावर आपला ठसा उमटवला.
विशेषतः सिंचन प्रकल्प आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेमुळे ते चर्चेत राहिले. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद आणि साखर कारखान्यांशी असलेला त्यांचा संबंध यामुळे ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव अधिक वाढला. २०१० मध्ये काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला नवे वळण मिळाले. पुढील काळात वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सात वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला, जो महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ मानला जातो.
जुलै २०२३ पासून त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व सिद्ध केले. युती सरकारच्या काळात आलेली लाडकी बहीण योजनेमुळे देखील अजित पवार आपल्या लाडक्या बहिणींच्या मनात घर करण्यास समर्थ ठरले. पवारांचे गुलाबी जॅकेट देखील त्याकाळात मोठा चर्चेचा विषय ठरलं होत. चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव, रणनीतीची जाण आणि संघटनात्मक ताकद यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘सिक्सर’ खेळणारे नेते मानले जातात.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते. विशेष बाब म्हणजे ज्या बारामतीमधून त्यांची सुरवात झाली त्याच बारामतीतमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. सगळ्यांच्या मनात दादा हे स्थान निर्माण करणारे नेतृत्व मात्र आज मातीआड गेलं आहे. त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राने मोठा चेहरा गमावलाय.


