AMC : नगर : केडगाव शास्त्रीनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. नागरिकांच्या घरासमोर मैला मिश्रित पाण्याचे तळे साचले आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा वेळोवेळी आंदोलन केली. आयुक्तांसह अधिकाऱ्यांना निवेदनही दिली. फक्त पोकळ आश्वासनाशिवाय काही पदरी पडले नाही. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेक साथीचे आजार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्यात मैला मिश्रित पाणी मिसळल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. परिसरातील नागरिकांचे स्किनचे आजार (Skin Diseases) यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. दवाखान्यामध्ये अनेक पैसे खर्च करूनही त्यावर उपचार होत नाहीत. शेवटी संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी व महिलांनी मैला मिश्रित पाणी बाटलीत भरून थेट अहिल्यानगर मनपा (AMC) आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्त तेथे उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी आयुक्त (Commissioner) दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
जोपर्यंत ड्रेनेज लाईन चा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा संतप्त आंदोलकांनी पवित्र घेतला. सहभागी झालेल्या संतप्त महिलांनी बाटलीत आणलेले पाणी आयुक्तांनी प्यावे व शास्त्रीनगर येथे निदान आठ दिवस तेथील नागरिकांसमवेत राहून दाखवावे, असे आवाहन करत माणुसकी असेल तर तात्काळ काम सुरू करावे अशी मागणी केली.
अवश्य वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर
आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित (AMC)
आंदोलन सामाजिक कार्यकर्ते अंगद महानवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून. आंदोलनात पप्पू भाले, दत्तात्रय दळवी, शुभम गायकवाड, विलास गायकवाड, सुधाकर बोरुडे, संगीता जपे, आशा बोरुडे, यमुना गायकवाड, मीरा रासकर, उज्वला कासार, सुमन बनकर, आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपयुक्त संतोष टेंगळे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, पाखरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आले. परंतु आंदोलक ठाम असल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. मुंडे यांच्यावर आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी व त्यांनी आंदोलकांची माफी मागावी असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.