Amhi Jarange Movie:’आम्ही जरांगे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित;मनोज जरांगेंच्या भूमिकेत दिसणार ‘हा’अभिनेता 

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

0
Amhi Jarange Movie
Amhi Jarange Movie

नगर : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी मोठा लढा दिला आहे. याच मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित (Teaser Relese) करण्यात आला आहे. या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे मनोज जरांगेंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

नक्की वाचा : ‘पुष्पा २’ मधील ‘मेरा सामी’ गाणं रिलीज; श्रीवल्ली आणि पुष्पाच्या हुक स्टेपने वेधले लक्ष 

ट्रेलरमध्ये नेमके काय ? (Amhi Jarange Movie)

‘आम्ही जरांगे’ सिनेमाच्या टीझरमध्ये मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची एक झलक पाहायला मिळत आहे. या टीझरमधील डायलॉग विशेष लक्षवेधी ठरत आहेत. “कर्म मराठा, धर्म मराठा”, “तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल”, “दहशतवादी आहोत का आम्ही” मनोज जरांगेंच्या तोंडी असलेल्या या डायलॉगमुळे सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अवश्य वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी   

या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही गाजलेली  कलाकार मंडळी आहेत. मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत.  

१४ जूनला प्रदर्शित होणार चित्रपट (Amhi Jarange Movie)

या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, या चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिलेत. मंगेश कांगणे, सुरेश पंडित, पी शंकराम यांनी या चित्रपटाची गीते लिहिली आहेत. हिंदीचे सुप्रसिद्ध  गायक सोनू निगम, मराठी व हिंदीत नावाजलेले संगीतकार व गायक अजय गोगावले, नकाश अझीझ, आदर्श शिंदे, यांच्या सुमधुर सुरांनी चित्रपटाची गाणी स्वरबद्ध करण्यात आलीत. येत्या १४ जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here