Anti-Corruption Department : संगमनेर : शिक्षण क्षेत्राला (Education Sector) काळिमा फासणारी घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. संगमनेर येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था विद्यालयातील सह सचिव बाबुराव गवांदे आणि लिपिक चंद्रभान मुटकुळे यांना ५० हजारांची लाच (Bribery) घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) रंगेहाथ पकडले.
नक्की वाचा : विशेष पोलीस पथकाचा मटका बुकींवर छापा; २२ आरोपींवर कारवाई
तक्रार शिक्षकांनी फिर्यादीत म्हटले आहे की,
माझी नियुक्ती पुणे महापालिका शाळेत शिक्षक (शिक्षण सेवक) म्हणुन झाली होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीत माझी नियुक्ती संगमनेर शहरातील एका नामांकीत संस्थेत २० टक्के अनुदानित तत्वावर झाली. त्यानंतर मी संस्थेचे मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळविल्याने त्यांनी माझी शिक्षक पदासाठी नियुक्ती केली आणि तसे नियुक्तीपत्र देखील दिले होते. त्यावेळी मी माझे पुर्वीचे पदाचा रितसर राजीनामा देवुन २० सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक म्हणून संगमनेर येथे रूजू झालो होतो. २४ जून २०२५ रोजी मी शालेय कामकाजामध्ये व्यस्त होतो. त्या दरम्यान दुपारी माझे मोबाईलवर संस्थेचे लेखनिक चंद्रभान मुटकुळे यांचे दोन मिसकॉल आलेले दिसले. म्हणुन मी त्यांना फोन केला आणि विचारले. की, सर तुम्ही कॉल केला होता का? तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला संस्थेचे सहसचिव बाबुराव गवांदे यांनी संस्थेचे कार्यालयात भेटावयास बोलावले आहे, असा निरोप दिला.
अवश्य वाचा : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, (Anti-Corruption Department)
त्यानुसार मी काही वेळाने दुपारी अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास संस्था कार्यालयात गेलो आणि संस्थेचे सहसचिव गवांदे यांना भेटलो. तेव्हा तेथे संस्थेचे लेखनिक मुटकुळे हे देखील उपस्थित होते. सहसचिव गवांदे म्हणाले की, तुम्ही २० टक्के अनुदानित पदावर सह शिक्षक म्हणून काम करीत आहात. भविष्यात पुढील टप्पा अनुदान ४० टक्के, ६० टक्के याप्रमाणे १०० टक्के पर्यंत शासनाचे अनुदान वाढणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला भरपूर पगार मिळणार आहे, हे सगळे माझे हातात आहे. माझे शिवाय तुमचे कोणतेही काम होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जरी तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फत या संस्थेत पाठविले असले तरी देखील तुमचे सगळे भविष्य माझे हातात आहे. कारण तुम्ही शासनाकडुन नियुक्त झालेले असल्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढावयाचे असल्याने वेळ वाया न घालवता तुम्ही संस्थेला ३ लाख रूपये आणुन जमा करा.
गवांदे पुढे म्हणाले की, आम्ही इतर शासनाकडून आलेल्या लोकांकडूनही ५ ते १० लाखापर्यंत पैसे जमा केलेले आहे. फक्त तुच असा एकटा आहे की, ज्याने आजपर्यंत एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे तुला भविष्यात सर्व काही सुरळीत चालू द्यायचे असेल व वेळेवर अनुदान घ्यायचे असेल येत्या तर २-३ दिवसांत ३ लाख रुपये माझेकडे आणून दे व याबाबत कोणालाही सांगू नको. दरम्यान, त्यावर संबंधित शिक्षक त्यांना म्हणाले की, माझी नियुक्ती परीक्षा देवुन शासनातर्फे झालेली आहे, त्यामुळे मी कशासाठी पैसे देवू, त्यावर त्यांनी सर्व संस्थांमध्ये असेच चालते व सर्व संस्थाचालक असे पैसे घेतात. तुझे भविष्यात होणाऱ्या सर्व आर्थिक बाबी संस्थेच्या हातात आहेत. तुझे करियरची ही सुरूवात आहे, जर तू पैसे आणून दिले नाही तर, तुझे करियर बरबाद करू शकतो एवढे माझेकडे अधिकार आहेत, अशी धमकी त्यांनी दिली.
दरम्यान, बाबुराव गवांदे यांच्याकडे विनंती केली पण त्यांची काही मानसिकता झाली नाही. ते पैसे घेण्यावर ठाम होते. त्यानंतर तडजोडी अंती २ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील ५० हजार रोख द्यायचे होते. याबाबत फिर्याद यांनी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानुसार हे पथक संगमनेर येथे दाखल झाले. त्यांनी सापळा रचला, संबंधित रक्कम घेऊन शिक्षक शुक्रवारी (ता. २७) दुपारी ४ वाजता घेवून संस्थेच्या कार्यालयात गेलो तेथे पंचांच्या समक्ष बाबुराव गवांदे यांची भेट घेतली त्यावेळी मी त्यांना सांगितले मी ५० हजार रुपये आणले आहेत. बाकीचे पैसे नंतर देतो, माझी नियुक्ती शासनातर्फे झालेली असतांना पैसे का घेतात असे विचारले असता त्यांनी संस्थेत प्रत्येक जण घेतो असे म्हणाले त्यानंतर मी ५० हजार रुपये लाचेची रक्कम देण्यासाठी पॅन्टचे खिशातून काढुन त्यांचे समोर धरले असता त्यांनी प्रथम नोटांना हात लावला व लागलीच लेखनिक मुटकुळे यांना आवाज दिला. त्यावेळी नोटांचे बंडल माझे हातातच होते. लेखनिक मुटकुळे हे आल्यानंतर त्यांनी मुटकुळे यांना पैसे घेवून मोजण्यास सांगितले. लेखनिक मुटकुळे यांनी लाचेची रक्कम माझ्याकडून स्वीकारली, त्याक्षणी दोघांना पथकाने ताब्यात घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.