Ashadhi Wari 2025: राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?;वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

0
Ashadhi Wari 2025:राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?;वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल
Ashadhi Wari 2025:राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?;वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

Ashadhi Wari 2025 : संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांबाबत सरकारला विसर पडला का ? असा संतप्त सवाल वारकर्‍यांकडून (Warkari) उपस्थित करण्यात आला आहे. विठूनामाच्या जयघोषात सुरू झालेल्या वारीत आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी २०,००० रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र, यंदा आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) सुरू झाली असतानाही सरकारकडून कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.

नक्की वाचा : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

निधीबाबत निर्णय नाहीच…(Ashadhi Wari 2025)

मागील वर्षी २०२४ निवडणुका असल्यामुळे आर्थिक मदत दिली होती का ? या वर्षी निवडणूक नाही, म्हणून वारकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवलं जातंय का? असे संतप्त सवाल वारकरी संप्रदायातून उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत वारकऱ्यांना निधी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, अजून  निर्णय झाला नसल्याची माहिती संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी दिली आहे.

अवश्य वाचा :  ‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर;अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते चित्रपटाचा पोस्टर अनावरण 

राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ? (Ashadhi Wari 2025)

लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला आहे का ? असा सवाल उपस्थित करत वारकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यंदा महाराष्ट्र शासनाने पालखी सोहळ्यासाठी वॉटरप्रूफ मंडप, मोबाईल टॉयलेट, मेडिकल टीम्स या मूलभूत सुविधा पुरविल्या आहेत. मात्र आमची मागणी आहे की, ज्याप्रमाणे मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपयांचा निधी दिला होता. तसाच निधी यंदाही द्यावा.आम्हाला अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरात लवकर मदत जाहीर करतील, असेही सोमनाथ घोटेकर यांनी म्हटले आहे.