Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 

Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 

0
Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 
Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 

Babanrao Pachpute : श्रीगोंदा: विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) उतरण्याची आमची केव्हाही तयारी आहे, विजय आपलाच राहणार आहे. पण तुम्हा दोघा भावांना जमिनीवर राहून लढ्याचे नेतृत्व करावे लागेल, अशा परखड भावना भाजपाच्या (BJP) युवा कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्यासमोरच विक्रमसिंह व प्रतापसिंह पाचपुते यांना सुनावल्या. 

नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय

भाजपा कार्यकर्त्यांची चिंतन बैठक

श्रीगोंदा येथील पाचपुते यांचे निवासस्थानी आमदार बबनराव पाचपुते यांचे उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांची चिंतन बैठक झाली. या बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना श्रीगोंद्यातून लीड का देता आले नाही, यावर चिंतन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी विकासकामे भरपुर केली, पण पवार, ठाकरेंची सहनभुतीची लाट कांदा, दूध प्रश्नामुळे घोळ झाला. विखे पाटलांनी चांगले नियोजन केले, पण प्रचाराची रणनिती कुठे चुकली, यावर पक्ष पातळीवर विचारमंथन होण्याची गरज आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक राहण्याची गरज आहे. 

Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 
Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 

अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले (Babanrao Pachpute)

२०१४ मध्ये झालेल्या हलगर्जीपणाची मोठी किंमत मोजावी लागली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपणास आतापासून सावध भूमिका घ्यावी लागेल. लोकांची मने जिंकावी लागतील. यावेळी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, अरुणराव पाचपुते, गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस, डॉ. प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब महाडीक, ॲड. प्रतापसिंह पाचपुते, संदीप नागवडे, बापु गोरे, संग्राम शिंदे, अशोक खेंडके, महेश दरेकर, सुरेश भंडारी, सतिश धावडे, दिपक शिंदे, राजेंद्र उकांडे, अशोक ईश्वरे, संतोष गुंड, धोंडीबा लगड, गणेश झिटे, कुंडलिकराव दरेकर आदी उपस्थित होते. विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, हिरडगाव साखर कारखान्यामुळे अडचणी होत्या. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणे अवघड होते. त्या अडचणी संपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील नियोजनाबाबत माझ्याविषयी चुकीच्या चर्चा होते झाल्या. सर्व मित्रपक्षांतील प्रमुख नेत्यांकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे नियोजन दिले होते. आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे.

Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 
Babanrao Pachpute : जमिनीवर या, पाचपुतेंच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here