Balasaheb Thorat : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव

Balasaheb Thorat : आमदार थोरात यांचा "उत्कृष्ट संसदपटू" पुरस्काराने गौरव

0
Balasaheb Thorat : आमदार थोरात यांचा
Balasaheb Thorat : आमदार थोरात यांचा "उत्कृष्ट संसदपटू" पुरस्काराने गौरव

Balasaheb Thorat : संगमनेर : महाराष्ट्राच्या कृषी, साहित्य, सहकार, समाजकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देताना राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाते भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे (Congress party) नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

मुंबई विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने 2018-19 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार थोरात यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. चाळीस वर्षाच्या संसदीय राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जपताना समाजकारण, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास , पर्यावरण, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रात आमदार थोरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

विकासात संगमनेर तालुका ठरला मॉडेल (Balasaheb Thorat)

याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, खार जमीन, राजशिष्टाचार, रोहयो, जलसंधारण असे विविध मंत्रीपदे भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले. महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा, विद्यार्थ्यांना शाळेत ८० लाख दाखले देण्याचा विक्रम, खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले, तर शिक्षण मंत्री पदाच्या काळात बेस्ट ऑफ फाईव्ह व कृषी मंत्री पदाच्या काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.
राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताना जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. आमदार थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या सहकारी संस्था या देशाला आदर्शवत ठरले असून ग्रामीण विकासात संगमनेर तालुका हा मॉडेल ठरला आहे.