Balasaheb Thorat : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात

Balasaheb Thorat : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात

0
Balasaheb Thorat : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात
Balasaheb Thorat : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात

Balasaheb Thorat : पाथर्डी : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री (Minister) नुकसानग्रस्तांना आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे कोणतेही आश्वासन देत नसून ते केवळ फोटोसेशन व पर्यटन (Tourism) करण्यासाठी येत असल्याची टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. थोरात यांनी शनिवारी (ता.२७) तालुक्यातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे

मंत्री लोकांशी संवाद न साधता निघून जात आहे

यावेळी आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर, शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, नासिर शेख, सुभाष केकाण, माउली केळगंद्रे उपस्थित होते. थोरात म्हणाले, कधी नव्हे एव्हडी अभूतपूर्व परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पिकाच्या नुकसानीसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अनेक शेतात आता दगडगोटे पाहावयास मिळत आहे तर अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. पशुधनाचे मोठे नुकसान होऊन कित्येक दुभती जनावरे व कित्येकांचे संसार वाहून गेले आहेत. व्यापाऱ्यांचेही एकीकडे मोठे नुकसान झाले असताना शेतकरी सुद्धा प्रचंड अडचणीत आला आहे. या परिस्थितीत शासनाने लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, दिलासा देण्याचे सोडून सरकार काहीतरी लपवत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पीकविमा मिळाला नाही. शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होत चालली असताना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही. नुकसानीचीच पाहणी करायला आलेले मंत्री लोकांशी संवाद न साधता तसेच निघून जात आहे.

नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक

पूल चुकीच्या पद्धतीने बांधल्याने अनेकांच्या शेतात पाणी (Balasaheb Thorat)

या विषयवार सरकारने ठाम भूमिका घ्यायला हवी पण तसे घडताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात पाहणी करायला येणार, असे सांगितले जात आहे. ते आले तर त्यांनी भरीव मदत द्यायला हवी. अनेक नवीन रस्त्यांची कामे करताना रस्त्यावरील पूल चुकीच्या पद्धतीने बांधल्याने अनेकांच्या शेतात पाणी गेले आहे.                                                                                                      

राज्यातील  धाराशिव,सोलापूर सह मराठवाड्यात  पावसाने थैमान घातले असून हा पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस आहे. उसासारखे दमदार पीकही या पावसाने भुईसपाट झाले आहे. तालुक्यातील तिसगाव येथील अनेकजण अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडले असताना त्यांची घरे पाडण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.