Balasaheb Thorat : पेपरफुटीतील आराेपींना दहा वर्षांची शिक्षा करा; बाळासाहेब थाेरातांची मागणी

Balasaheb Thorat : पेपरफुटीतील आराेपींना दहा वर्षांची शिक्षा करा; बाळासाहेब थाेरातांची मागणी

0
Balasaheb Thorat : पेपरफुटीतील आराेपींना दहा वर्षांची शिक्षा करा; बाळासाहेब थाेरातांची मागणी
Balasaheb Thorat : पेपरफुटीतील आराेपींना दहा वर्षांची शिक्षा करा; बाळासाहेब थाेरातांची मागणी

Balasaheb Thorat : नगर : राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेत (Competitive Examination) घोटाळा होत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. पेपरफुटीतील आरोपींना १० वर्षांची शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत (Assembly) केली. पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापुढे पेपरफुटीसारखी प्रकरणाला लगाम लावण्यासाठी परीक्षा पद्धतीतील बदल सभागृहात सांगितले.

नक्की वाचा: नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून काम करतील

पेपरफुटीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सध्या सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाइन होत असल्याने पेपर फुटणे एवढं सोपं नाही. परीक्षा केंद्रावर कर्मचाऱ्यांनी आधीच संगनमत केलं असेल, तरच तासाभरातच पेपर फुटतो. यामुळे परीक्षा केंद्रावर कोण कर्मचारी असेल, हे परीक्षेच्या दिवशी सकाळीच संबंधित कर्मचाऱ्यांना कळेल. जसं निवडणुकीत निरीक्षक असतात तसे परीक्षेच्या दिवशी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून काम करतील आणि परीक्षा केंद्रांची पाहणी करतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

अवश्य वाचा: ‘आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री’- संभाजी भिडे

पेपेरफुटी प्रकरणांत कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप (Balasaheb Thorat)

बाळासाहेब थोरात यांनी पेपेरफुटी प्रकरणांत कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. पेपरफुटीचा प्रश्न गंभीर आहे. टीसीएस स्वत:च्या केंद्रावरच परीक्षा घेते, पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने बाहेरील केंद्रावर परीक्षा घेतली होती. यापुढच्या परीक्षा मात्र टीसीएसकडून आपल्या केंद्रांवरच घेण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी भरतीमध्ये पेपर फुटला नाही, तर पेपरच उत्तर चुकलं. जी उत्तराची पद्धत असते त्यामध्ये चूक झाली. जर उत्तर चुकलं, असेल तर नियमानुसार सगळ्यांना समान गुण दिले जातात. पण नंतर तो पेपर रद्द केला, असे फडणवीस यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here