Balasaheb Thorat:’लाडकी बहीण नाही,लाडकी सत्ता हवी’;बाळासाहेब थोरात यांची अजित पवारांवर टीका 

0
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

Balasaheb ThoratOn Ajit Pawar : लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटण दाबावं लागेल,याचा अर्थ असा यांना लाडकी बहीण नाही,सत्ता हवी आहे. ही लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे. मात्र हे सगळं जनता ओळखून आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)अजित पवारांवर (Ajit Pawar) केला आहे.

नक्की वाचा : मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही,ते पूर्ण करण्याची धमक ठेवतो’-अजित पवार

बाळासाहेब थोरात यांचा अजित पवारांसह राज्य सरकारवर निशाणा (Balasaheb Thorat)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा नाशिकपासून सुरु झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे. तुम्हाला निवडणुकीत महायुतीचे बटण दाबायचे आहे. तिन्ही पक्षाचे बटण दाबू नका. एकच पक्षाचं बटण असणार आहे. महायुतीच्या पक्षाचं बटण दाबा,असे वक्तव्य केले. आता यावरूनच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

अवश्य वाचा : शौर्य आणि संघर्षाची गाथा सांगणारा‘फौजी’चित्रपट;’या’दिवशी होणार प्रदर्शित

थोरात पुढे म्हणाले की, अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे. यावरून देखील बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना डिवचले आहे. रंग गुलाबी करून काय उपयोग आहे ? लोकांनी सगळं तुमचं अनुभवलेलं आहे. त्याचा ठसा एवढा उमटलेला आहे की, आता गुलाबी करून काही होईल, असं मला वाटत नसल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी काही चर्चा केल्या आहेत. प्रामुख्याने निकष कसे असावे? काय असावे? याबाबत प्राथमिक चर्चा आम्ही केली आहे. त्या पद्धतीने पुढच्या बैठकीत आम्ही आणखी चर्चा करू, लवकर जाग निश्चित होतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही २८८ जागा लढू. त्यामध्ये मित्र पक्षांचाही सहभाग असेल. विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकू,असे त्यांनी यावेळी सांगितले.  

‘सरकारला केवळ मतांचे पडले आहे’ (Balasaheb Thorat)

नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक-मुंबई हा प्रवास करताना पाच-सहा तास लागतात. कधी कधी एकाच जागेवर पाच तास लागतात, खड्डे असतात ट्राफिक असते. इतकी वाईट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. सरकारचं नागरिकांच्या  या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना केवळ मतांचे पडले आहे, सत्तेचे पडलेले आहे. ते यातच गुंतलेले आहेत. यावर्षी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर अजून सापडलेलं नाही. शासन म्हणून नियंत्रण पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. या परिस्थितीवर नाशिककर आणि मुंबईकर प्रचंड नाराज आहेत, असे त्यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here