Beed Airport: रेल्वेनंतर आता बीडला विमानतळ होणार;नेमकं कुठे होणार विमानतळ?

0
Beed Airport:रेल्वेनंतर आता बीडला विमानतळ होणार;नेमकं कुठे होणार विमानतळं?
Beed Airport:रेल्वेनंतर आता बीडला विमानतळ होणार;नेमकं कुठे होणार विमानतळं?

नगर : बीडच्या (Beed Airport) नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. कारण रेल्वेनंतर आता बीडमध्ये विमानही लँड (Plane Landing) होणार आहे. यासाठी प्रशासनाने कामखेडा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली आहे. एअरपोर्ट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा परिसराची पाहणी केली.त्यांनी प्राथमिक चर्चेतून असा निष्कर्ष काढला आहे की, बीड जवळील कामखेडा परिसर विमानतळ प्रकल्पासाठी सर्वात योग्य ठरेल.

नक्की वाचा:  सचिन जगताप आता मुख्यमंत्री;सन टीव्हीवरील ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये साकारणार भूमिका  

विमान सेवेसाठी किती जमीन लागणार? (Beed Airport)

अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, या ठिकाणी राज्य सरकारकडे दोनशे एकर पेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. जमिनीचा उतार, भौगोलिक परिस्थिती आणि परिसराची सुसंगतता हे सर्व विमानतळ उभारणीसाठी पोषक आहेत. या प्रकल्पासाठी एकूण १७० हेक्टर जमीन लागणार आहे, ज्यापैकी ८० हेक्टर जमीन सरकारकडे उपलब्ध आहे. उर्वरित जमीन भूसंपादन द्वारे मिळवावी लागणार आहे.

अवश्य वाचा: राज्यातील नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर;वाचा कुठे जाहीर झालं आरक्षण?

आता प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया, प्रकल्पाची डिझाईनिंग आणि बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. बीड विमानतळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील नव्या विमानतळांपैकी हा महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे बीडच्या लोकांसाठी सुविधा, रोजगार आणि आर्थिक प्रगती याची नवी दालनं उघडणार आहेत, ज्यामुळे शहराचे महत्त्व देशाच्या हवाई नकाशावर वाढेल.

विमानतळामुळे बीड मोठ्या शहरांशी जोडलं जाणार (Beed Airport)

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी देखील कामखेडा परिसराचे दौरे करून विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा आणि पायाभूत रचनेवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी विमानतळ उभारणीसाठी लागणारी रणनीती, सुरक्षा निकष आणि पर्यावरणीय बाबींचा तपास केला. विमानतळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांशी थेट हवाई मार्गाने होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार, तसेच पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांकडून या प्रकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे.