
नगर : बंगळुरुच चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium) आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत (RCB’s victory procession) झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) घटनेमुळे चर्चेत आले आहे. या दुर्देवी घटनेत ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले. १८ वर्षानंतर पहिल्यांदाच RCB ची टीम चॅम्पियन ठरली. त्यासाठी स्टेडियमच्या आत जोरदार सेलिब्रेशन सुरु होतं. मात्र त्याचवेळी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेत एका व्यक्तीने आपला मुलगा गमावला. या घटनेत ते आपलं सर्वस्व गमावलेलय पित्याने आपल्या मुलाच्या मृतदेहाच शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम (Post Mortem) करु नका,अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा : ‘लाडक्या बहिणींना सरकारने केवळ मतांसाठी चटक लावली’- यशोमती ठाकूर
त्याची बॉडी तुकड्यांमध्ये कापू नका… (Bengaluru Stampede)
मृत पित्याने यावेळी टाहो फोडला आहे.“त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका. त्याचा मृतदेह मला द्या. त्याची बॉडी तुकड्यांमध्ये कापू नका” असं हा पिता सांगत होता. आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या पित्याच्या डोळ्यात अश्रू होते. “माझा एकच मुलगा होता. मी त्याला गमावलं. तो इथे मला न सांगता आला होता. आता इथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येतील. पण माझा मुलगा कोणी परत आणू शकत नाही” अशा शब्दात या पित्याने आपलं दु:ख मांडलं आहे.
अवश्य वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार ?
आरसीबीच्या विजयाला गालबोट (Bengaluru Stampede)
इंडियन प्रीमियर लीगमध्ये १८ वर्षानंतर पहिल्यांदा आरसीबीची टीम चॅम्पियन बनली. त्यासाठी बंगळुरुमध्ये व्हिक्टरी परेड आयोजित केली होती. विजयाच सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या दरम्यान मोफत तिकिटाची अफवा पसरली. ही अफवा एका मोठ्या दुर्घटनेत बदलली. आतमध्ये सेलिब्रेशन सुरु राहिलं. बाहेर परिस्थिती बिघडत गेली. मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते. या जमावाला नियंत्रित करणं कठीण झालं होत.जमावातील लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती खराब होऊन अखेर चेंगराचेंगरी झाली आहे.