Manoj Jarange Patil:मोठी बातमी!मनोज जरांगेचं उपोषण स्थगित

0
Manoj Jarange Patil:मोठी बातमी!मनोज जरांगेचं उपोषण स्थगित
Manoj Jarange Patil:मोठी बातमी!मनोज जरांगेचं उपोषण स्थगित

Manoj Jarange patil : मागील गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण (Hunger Strike) करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत,असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांची मुदत देऊ केली आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा : एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका’;लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप  

‘फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका’ (Manoj Jarange Patil)

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, आचारसंहिता लागेपर्यंत मी राजकीय भाषा बोलणार नाही. त्यानंतर कोण काय बोलले हे मी सांगतो. मी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज त्यांनी दिला आहे. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका, मी काहीच येऊ देणार नाही, नंतर बोंबलु नका असे जरांगे पाटील म्हणाले. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस;पुण्याला रेड अलर्ट तर नगरमध्येही जोरदार बरसणार  

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, माझ्या लोकांना मारहाण केली, पण माझं ऐकून त्यांनी मार खाल्ला. सलाईन घेऊन मी उपोषण करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. श्रीमंत मराठे आपली पोर कधीच मोठ होऊ देणार नाहीत. शेतकरी मराठा रात्रंदिवस चिखलात उन्हात काम करून आपलं लेकरु कधी नोकरीला लागेल याची वाट बघतो. मजूर मराठा देखील वाट बघतो. प्रत्येक पक्षातील मराठा वाट बघतो असे जरांगे पाटील म्हणाले.

‘मराठ्यांनी अजिबात खचून जाऊ नये(Manoj Jarange Patil)

आचारसंहिता लागेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठ्यांनी खचून जाऊ नये, सरकारने आपल्याशी धोका केला तर तुम्ही आपल्या लेकरांना धोका देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पक्षाच्या नेत्यांच्या पोरं मोठे करण्याच्या नादाला लागून आपल्या लेकरांचे वाटोळं करू नका, राजकारणाच्या नादाला लागू नका, अडाणी का होईना आपले लोक सभागृहात पाहिजे असंही ते म्हणाले. आरक्षण नाही दिले तर सत्तेत जाऊ. मला रोज मंत्र्यांचे फोन येत आहेत. मला चार -पाच  दिवस तरी आरामाची गरजआहे, मला हॉस्पिटल ला भेटायला येऊ नका, पुन्हा अंतरवलीमध्ये भेटू,असंही जरांगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here