BJP : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

BJP : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

0
BJP : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
BJP : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

BJP : नगर : समाज प्रबोधनकार संग्राम भंडारे महाराज (Sangram Bapu Bhandare) यांच्यावर घुलेवाडी गावातील काँग्रेस समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या वाहानाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच समाज प्रबोधनकार संग्राम भंडारे महाराजांच्या जीवास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजप (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite), उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर (Nitin Dinkar) व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग (Dilip Bhalsingh) यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे.

अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

समाजकंटकांकडून चालू कीर्तनात गोंधळ

समाज प्रबोधनकार भंडारे महाराज हे घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहात कीर्तन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रतिपादन करत होते. त्यावेळी घुलेवाडी गावातील काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून आरडाओरडा करत कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या समाजकंटकांनी त्यांच्या वाहनांवर मोठ मोठे दगड टाकून वाहनाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. या प्रकारामुळे कीर्तनासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला असून हे मोठे षडयंत्र व सुनियोजित कट आहे.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी (BJP)

भंडारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लाखोराना अटक करून त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचा छडा लावणे आवश्यक आहे. ते काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयीन कर्मचारी पदाधिकाऱ्यांना चिथावणी देणाऱ्यांचा सुद्धा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. घुलेवाडी येथे झालेल्या गंभीर घटनेची दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी व समाज प्रबोधनकार संग्रामबापू भंडारे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.