CBSE Board Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने (CBSE Board) एक मोठा निर्णय घेतलाय. सीबीएसईने २०२६ पासून वर्षातून दोनदा १० वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज (Sanyam Bhardwaj) यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून सीबीएसईच्या १० वी बोर्डाच्या (10 th board Exam) आता वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात फ्रेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात या परीक्षा होतील.
नक्की वाचा : मोठी बातमी!शुभांशू शुक्लांसह ४ अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले
सीबीएसईने का घेतला निर्णय ? ( CBSE Board Exam)
सीबीएसईने हा निर्णय केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीवरून घेतला आहे. मुलांवरील मानसिक दडपण आणि तणाव कमी करणे हा या निर्णयामागचा हेतू आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या चूका सुधारण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे पूर्ण मूल्यांकन एकाच परीक्षेद्वारे करता येत नाही, असं बोर्डाचे मत आहे.
अवश्य वाचा : गुगल,फेसबूकसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील १६ अब्ज पासवर्ड्स लीक;केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
पहिल्या टप्प्यातील परीक्षेला हजर राहणे बंधनकारक (CBSE Board Exam)
सीबीएसईच्या १० वी बोर्डाच्या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेला हजर राहणे बंधनकारक आहे तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पर्याय म्हणून आहे. मुलांचे अंतरिम मूल्यांकन केवळ एकदाच केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत सुधारणा करण्याची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यातील परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.