नगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून (Ujani Dam) सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात (Temples begin to go under water) झाली आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या हजारो भाविकांसोबत पंढरपूरची वाट चालत असून अनेक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत. सध्या चंद्रभागेत सोडलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा अंदाज न आल्याने भाविकांच्या बुडण्याच्या घटना ही समोर येत आहेत.
नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस
चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या ६ भाविकांना वाचवण्यात यश (Chandrabhaga River)
आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागेची पूर परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणामधून जवळपास २६,६०० विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. यात्रा कालावधीत पाऊस झाल्यास धरणात पाणी साठवता यावे, यासाठी प्रशासनाने हे नियोजन केले आहे.अजून पाच ते सहा दिवस असेच पाणी सोडण्यात येणार आहे. बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४० स्थानिक कोळी बांधवांची नेमणूक केली आहे. याच कोळी बांधवांनी काल (ता.२२) सहा भाविकांना वाचवले आहे. मात्र प्रशासनाने चंद्रभागेच्या तीरावर सुरक्षारक्षक नेमल्यास बुडण्याच्या दुर्घटना घडणार नाहीत, असे देखील बोललं जात.सध्या चंद्रभागा वाळवंटातही पाणी वाढण्यास सुरुवात झाली असून पुंडलिकासाठी इतर मंदिरात जाताना भाविकांना पाण्यातून जावे लागत आहे.
अवश्य वाचा : नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; ८८.१६ मीटर थ्रोसह जिंकली पॅरिस डायमंड लीग
वाळवंटातील मंदिरात पाणी जाण्यास सुरुवात (Chandrabhaga River)
आषाढीत भाविकांना महापुराचा त्रास होऊ नये, यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी चंद्रभागेत पोहोचू लागल्याने चंद्रभागा व वाळवंटातील काही मंदिरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. आषाढीला भाविकांना चंद्रभागेत स्नानापुरते पाणी ठेवण्यासाठी २८ ते २९ जून पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. यानंतर जरी पाऊस झाला तरी उजनी धरणात वरून येणारे पाणी साठवायला जागा राहील. याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.