Chandrashekhar Bawankule:’नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही’- चंद्रशेखर बावनकुळे 

0
Chandrashekhar Bawankule :'नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही'- चंद्रशेखर बावनकुळे 
Chandrashekhar Bawankule :'नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही'- चंद्रशेखर बावनकुळे 

नगर : ‘केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका’,असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी दिला आहे. नाशिक (Nashik) येथे आज भाजपच्या वतीने मेळाव्याचे (BJP rally) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले आहे.

नाशिकमधील बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख सांगितली आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आता तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरुन काम करावे लागणार आहे.

नक्की वाचा :मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य  

‘कमळ चिन्हावर लढणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही’ (Chandrashekhar Bawankule)

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करुन ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. ही कार्यशाळा मोदींच्या ११ वर्षाची कारकीर्द सांगण्याची आहे. आगामी निवडणुकीत एक-एक मत महत्वाचं आहे, कमळ चिन्हावर लढणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही, हा संकल्प आम्ही घेतला असल्याचे बावनकुळे म्हणालेत. 

अवश्य वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो

 ‘१५ ऑगस्टला स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लागेलंच’ (Chandrashekhar Bawankule)

विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले होते. आता,१५ ऑगस्टला स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लागेलंच, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत ‘सिंदूर’चा बदला घेतला, तो दुसऱ्या सरकारनं घेतला नसता, असेही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here