नगर : आपल्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणारे एक कुशल रणनीतीकार, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे एक दूरदर्शी नेते होते. ज्यांनी मराठा साम्राज्य आणि मराठा नौदलाची (Maratha Navy) स्थापना केली.ज्या काळात युरोपीय शक्ती समुद्रांवर नियंत्रण ठेवत होत्या, त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वावलंबी नौदल दलाचा मार्ग आखला आणि त्यांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ (Father of the Indian Navy) ही पदवी मिळाली.आता भारतीय नौदलाचे प्रणेते म्हणून शिवाजीं महाराजांना का सन्मानित केले जाते हे पाहुयात..
ज्या काळात युरोपीय शक्ती समुद्रांवर नियंत्रण ठेवत होत्या,त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वावलंबी नौदल दलाचा मार्ग आखला. १४९८ मध्ये वास्को द गामा कालिकत येथे आल्यानंतर, पोर्तुगीजांनी अरबी समुद्र आणि त्याच्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण स्थापित केले.
नक्की वाचा : मोठी बातमी!राज्यातील नऊ लाख बहिणींचे १५०० रुपये होणार बंद
दरम्यान, १६१३ मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरतमध्ये आपला पहिला कारखाना स्थापन केला. १६६५ पर्यंत, कंपनीने मुंबईवर नियंत्रण मिळवले आणि बेटाच्या आग्नेय कोपऱ्याला एका किल्ल्याचे मजबुतीकरण करण्यास सुरवात केली ज्याचं काम १६८३ मध्ये पूर्ण झाले. भारतीय किनारपट्टीवर त्याकाळी ब्रिटिश,डच आणि फ्रेंच देखील सक्रिय होते. कोकण किनाऱ्यावरील जंजिरा येथे सिद्दींनी स्वतःचे वर्चस्व स्थापित केले होते. अशा राजकीय परिस्थितीत, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला (सध्याच्या पुणे जिल्ह्यातील) जिंकून ‘स्वराज्याचा’ पाया रचला. महाराजांनी कोकण आणि कोल्हापूर प्रदेशाचा बराचसा भाग स्वराज्यात समाविष्ट केला आणि कल्याण आणि भिवंडी सारख्या महत्त्वाच्या उत्तरेकडील बंदरांवर नियंत्रण मिळवले.
अवश्य वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास
शिवाजी महाराजांनी आपले नौदल बांधण्यास कशी सुरुवात केली?(Chhatrapati Shivaji Maharaj)

राज्याच्या महसुलासाठी परकीय व्यापार आवश्यक असल्याने आणि समुद्री चाच्यांचा सतत धोका असल्याने,शिवाजी महाराजांना हे समजले की,त्यांच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी नौदल शक्तीची आवश्यकता आहे. त्यांनतर नौदलाच्या बांधणीला सुरवात झाली. १९ जुलै १६५९ रोजी पोर्तुगीज परिषदेने वसईच्या कप्तानच्या अहवालावर चर्चा केली. ज्यामध्ये शिवाजी महाराज सिद्दींना आव्हान देण्यासाठी एक नौका बांधत असल्याचा इशारा देण्यात आला होता. एका शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याच्या भीतीने,परिषदेने त्याच्या योजना उधळून लावण्यासाठी आणि वसईच्या संरक्षणाला बळकटी देण्यासाठी हालचाल केली.
शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या रणनीतीमध्ये किल्ल्यांचे महत्त्व:(Chhatrapati Shivaji Maharaj)

१६५७ ते १६५८ दरम्यान, शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याच्या १०० किमी लांबीच्या सावित्री नदीपासून ते कोहोज आणि अशेरीगड या उत्तरेकडील किल्ल्यांपर्यंत आपले राज्य वाढवले. त्यांनी सुरगड, बिरवाडी, तळा, घोसाळे, सुधागड, कांगोरी आणि रायगड यासह अनेक महत्त्वाचे किल्लेही जिंकले. त्यांच्या नौदलाने आदिलशाही, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांची जहाजेही जिंकली.
नौदलाच्या आधीच्या ध्वजावर सेंट जॉर्जेस क्रॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन लाल रेषा होत्या. ज्या ब्रिटिशांच्या राजवटीपासून कायम होत्या. गुलामीचे ते चिन्ह २०२२ मध्ये मोदी सरकारने बदलले आणि या ध्वजाचं डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. भारतीय नौदलाचे जनक समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करण्यासाठीच नौदलाच्या ध्वजामध्ये शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला ठळक स्थान देण्यात आले आहे. या नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शं नो वरुणः’ असे नाव कोरलेले आहे. याचा अर्थच असा आहे की,पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ असू देत. भारतीय सनातन परंपरेत वरुणाला पाण्याची देवता मानले जाते असाही त्याचा अर्थ सांगितला गेला आहे.