Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांनी फिल्मफेअरवर उमटवली मोहोर

0
Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांनी फिल्मफेअरवर उमटवली मोहोर
Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांनी फिल्मफेअरवर उमटवली मोहोर

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच अहमदाबादमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात (Filmfare Awards 2025) त्यांना मोठा पुरस्कार मिळाला आहे. ७० व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ मध्ये छाया कदम यांचा सन्मान करण्यात आला. ‘लापता लेडीज’ (Lapata ladies) या चित्रपटामध्ये साकारलेल्या ‘मंजू माई’ या पात्रासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री'(Best Supporting Actress) हा फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार छाया कदम यांना मिळाला आहे.

नक्की वाचा : हुंडा घेणारे नामर्द! स्त्री जर टिकली नाही तर समाज कसा टिकेल?;मकरंद अनासपुरे यांचा सवाल  

शाहरुख खानने मारली छाया कदम यांना मारली मिठी  (Chhaya Kadam)

‘मंजू माई’च्या भूमिकेला मिळालेल्या या मोठ्या सन्मानामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानाने उंचावली आहे. या पुरस्काराची घोषणा होताच, छाया कदम यांचा आनंद गगनात हा मावेनासा झाला. हा क्षण छाया कदम यांच्यासाठी खूप खास होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा छाया कदम स्टेजवर गेल्या, तेव्हा तिथे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान उपस्थित होता. भावूक झालेल्या छाया यांना शाहरुखनं धीर देत मीठी मारून त्यांचं कौतुक केलं. ऐवढंच नाही शाहरुखनं स्वत: छाया यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं.

अवश्य वाचा:  हैद्राबादचं खुराट बोकड आलं अन् काहीतरी बडबड करुन गेलं;संग्राम जगताप यांची असदुद्दीन ओवीसींवर खोचक टीका 

छाया कदम नेमकं काय म्हणाल्या ?   (Chhaya Kadam)

यावेळी छाया कदम म्हणाल्या की, “प्रत्येकवेळी असं वाटायचं की,आता मला पुरस्कार मिळेलच. सगळेजण कौतुक करायचे, पण पुरस्कार काही मिळत नव्हता. यावेळी विचार करून ठेवला होता, अवॉर्ड मिळो न मिळो, छान तयार होऊन आपण या सोहळ्याला जायचं. खूप आभार… किरण आय लव्ह यू…तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. एका मराठी मुलीला तू युपीमधली मंजू माई बनवलंस. मला स्वत:ला खात्री नव्हती की, मी खरंच ही भूमिका करेन की नाही. पण, किरण तू नेहमी मला विश्वास दिलास. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे लोक इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात. कधी होणार? कधी पुरस्कार मिळेल? मेरा टाइम कब आएगा? त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे”