Death : विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Death : विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

0
Death : विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
Death : विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Death : श्रीगोंदा : पावसात पडलेल्या विद्युत पोलच्या तारांमध्ये चालू असलेल्या विद्युत प्रवाहामुळे (Shock) एका शेतकऱ्यासह दोन शेळ्या जागीच ठार (Death) झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील वाळके वस्ती परिसरात घडली. या घटनेने बेलवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या (MahaVitaran) अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नक्की वाचा : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

पावसात दोन विद्युत पोल पडूनही दुर्लक्ष

या घटनेत संभाजी किसन वाळके हे शेतकरी जागीच गतप्राण झाले. बेलवंडी गावातील वाळकेवस्ती येथील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल बुधवारी (ता.१२) रात्रीच्या पावसात पडले होते.

अवश्य वाचा : इटलीच्या संसदेत राडा;खासदारांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी

वीज वितरणनच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी (Death)

विजेचे पोल पडून सुमारे १८ तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा चालू होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरत असताना त्या तारेजवळ गेल्या आणि त्यांना विद्युत शाॅक लागला. यावेळी शेळ्या घेऊन गेलेले संभाजी वाळके यांनी शेळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शेतातील साचलेल्या पाण्यात पडलेल्या विजेच्या तारामुळे शाॅक लागला. विजेच्या तीव्र धक्क्याने संभाजी वाळके हे जागीच मयत झाले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके जागीच गतप्राण झाले होते. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कैलास शिपणकर, नंदकुमार पठारे यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करत रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here