Farmers Protest : शंभूसीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये झटापट;अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

शंभू सीमेवर घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

0
Farmers Protest
Farmers Protest

नगर : किमान आधारभूत किमतीच्या (MSP) मागणीसाठी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश येथील शेतकरी (Farmers) चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच केली आहे. अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे.

नक्की वाचा : रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

पोलिसांचा शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न (Farmers Protest)

शंभू सीमेवर घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन थांबवावं तसेच दिल्लीच्या दिशेने जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, शेतकरी कुणाचंही ऐकण्यास तयार नाहीये. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर दिल्लीत धडकणारच असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

अवश्य वाचा : नगर शहराचा पाणीपुरवठा काेणत्याही क्षणी खंडित हाेणार

शेतकरी आंदोलनावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार (Farmers Protest)

शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा हायकोर्टात पोहचलं आहे. शंभू सीमेवर ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन मशीन जमा करणे हा कायदा आणि सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे.  पंजाब सरकारने यावर कारवाई करावी असं म्हणत हरियाणा सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here