Devendra Fadnavis : माेदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : माेदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देणार : देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : माेदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नगर : नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे (mahayuti sarkar) आहे. मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज दिली जाणार आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागाकरिता सुरू असलेले जल सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार

जामखेड येथे महायुतीच्या प्रचार

 सभेत ते बाेलताना म्हणाले ” लाेकसभेची ही निवडणूक गल्लीतील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला कोण विकासाकडे नेऊ शकतो. सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो. याचा फैसला करणारी निवडणूक आहे. यामुळे पंतप्रधान पदांची संगीत खुर्ची खेळणाऱ्यांच्या मागे जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत देशाला विकासात पुढे आणले आहे. यामुळे डॉ. सुजय विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत ही जाणीव ठेवा.” असा सल्ला दिला. 

हे देखील वाचा: स्वतःचे सरण रचून त्याने पत्करले मरण!

यांची उपस्थिती (Devendra Fadnavis)

यावेळी आमदार सुरेश धस, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आदी उपस्थित हाेते. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here