Devendra Fadnavis:वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पाचही वर्षात वीजदर कमी होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

0
Devendra Fadnavis:वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पाचही वर्षात वीजदर कमी होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Devendra Fadnavis:वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पाचही वर्षात वीजदर कमी होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Devendra Fadnavis: वीजग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर (Electricity rate) ठरवण्यासाठी महावितरणने (Mahavitran) दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे. घरगुती,औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात(Electricity tariff reduction) करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!वर्षातून दोन वेळा होणार १० वीची बोर्ड परीक्षा;सीबीएसई बोर्डाचा निर्णय   

मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचे आभार (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

अवश्य वाचा :  मोठी बातमी!शुभांशू शुक्लांसह ४ अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले  

राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण ७० टक्के (Devendra Fadnavis)

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण,राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७०टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे असे फडणवीस म्हणाले.