Devendra Fadnvis : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये (Alandi) कत्तलखाना (Slaughterhouse) उभारण्याचा कोणताही मानस नसून, त्यासाठी आरक्षित असलेली जागाही आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM devendra Fadnavis) यांनी सांगितले आहे.आळंदीत कत्तलखाना उभारला जाणार असल्याच्या चर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातून मोठे स्पष्टीकरण दिले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील आळंदी शहराजवळ विकास आराखड्यात कत्तलखाण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.आळंदी सारख्या पवित्र देवस्थानाजवळ अशा प्रकारचे आरक्षण देण्यात आल्यामुळे विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
नक्की वाचा : ‘बोलबच्चन भैरवी असलेल्यांना मी उत्तर देत नाही’;देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
‘आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही’ (Devendra Fadnvis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखाण्याकरिता दाखवण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत. मी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला आश्वासन देतो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही.
अवश्य वाचा : मोठी बातमी! महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी २ महिने बंद
कर्जमाफी बाबत काय म्हणाले फडणवीस ? (Devendra Fadnvis)
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, मी कर्जमाफी बाबत सविस्तर सांगितलेलं आहे. सरकार शब्द फिरवत नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. सगळं होईल,असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. पावसामुळे वाढलेल्या धरणसाठ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत, कधी विसर्ग सोडायचा कधी कमी करायचा, याबाबत बाजूच्या राज्यांशी देखील आमचे बोलणे सुरू आहे.