Eknath Shinde : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
Eknath Shinde : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : नगर : महसूल (Revenue) व पशुसंवर्धन विभागातर्फे राबविला जाणारा पंधरवडा हा शासनाची प्रतिमा उंचविणारा ठरणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडामध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी शिबिर आयोजित करून जास्तीत-जास्त लाभ द्यावा, असे त्यांनी सांगितले. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) तसेच शेतकऱ्यांशी संबंधित सर्व योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी केले.

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

महसूल पंधरवड्याचा प्रारंभ

राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल पंधरवड्याचा प्रारंभ मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा: स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले (Eknath Shinde)

”महसूल पंधरवाडा व पशुसंवर्धन पंधरवाडा दोन्हीसाठी शुभेच्छा देताना आनंद होतो आहे, हे नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील यंत्रणेचे प्रमुख असून सर्व विभागांसह शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहून महसूल पंधरवड्यामध्ये चांगले काम करावे. कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी अधिक गतिमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत जनकल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमुख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे.


पंधरवाडा निमित्त सर्व विभाग एकत्र येऊन काम करत असले, तरी शासन नेहमीच नागरिकांसाठी काम करत आहे. आपण या निमित्ताने विविध योजना लोकांपर्यंत नेऊन शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. पशुसंवर्धन पंधरवाडामध्ये राज्यातील दूध भेसळीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर अतिशय कठोर काम केले जावे. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल यासाठी मोक्का सारखी कारवाई करावी. महसूल विभागाने सर्व यंत्रणच्या सहकार्याने दाखले व विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन काम करावे, असे आवाहन या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल. पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागाचा नागरिकांशी जन्म दाखल्यापासून, मृत्यू दाखल्यापर्यंत संबंध येतो. यामुळे महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा आणि महसूल विभागातील विविध शासकीय योजना व सेवा सुविधा यांची माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचावी, लोकांमध्ये विभागाबद्धल विश्वास दृढ व्हावा, यासाठी महसूल विभागातर्फे महसूल दिन आणि सप्ताह साजरा केला जात होता. पण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळी विस्तार करून सप्ताहऐवजी पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम, शिबिरे राबवून महसूल संबधित कामे केली जातील. यात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी दिले जाणारे दाखले, जमिनीच्या संदर्भातील रखडलेली प्रकरणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना. युवांशी संवाद, सैनिकांची महसूल संबधित विविध कामे केली जातील.  

पशुसंवर्धन पंधरवड्याबद्दल माहिती देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की,  ”देशातील अर्थव्यवस्थेत ४.११ टक्के पशुपालन व्यवसायाचा वाटा आहे. यामुळे राज्यातील पशुपालन व्यवसाय वाढीस लागावा आणि शेतकऱ्यांना पशुपालन हा जोडधंदा न राहता प्रमुख उत्पनाचे साधन बनावे, यासाठी प्रथमच पशुसंवर्धन विभागातर्फे पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पंचसूत्री कार्यक्रम राबवून पशुपालक यांच्यात जनजागृती करणे आणि पशुधनाची काळजी घेतली जाणार आहे. यात उच्च उत्पादक क्षमता असलेल्या वंशावळाची पैदास करणे, जनावरांचे लसीकरण, वैद्यकीय तपासणी, दूध योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण, पशुधनास सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि २१ व्या पशुगणना अभियानाची जनजागृती केली जाणार आहे,” अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here