Agriculture News:शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार

0
Agriculture News:शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार
Agriculture News:शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला (Fruits and vegetables) आता गोव्यातील (GOA) विक्री केंद्राला लिंक होणार आहे. याबाबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी आश्वासन दिले आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार परमेंद्र शेट यांनी फळे व भाजीपाला पुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.

नक्की वाचा : ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके  

गोव्यात ग्राहकांना माफक किमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम (Agriculture News)

फळे व भाजीपाला पुरवठा करण्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजीपाला पुरवठा करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. गोवा सरकार दीड हजार आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना माफक किंमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम राबवीत आहे. फळे व भाजीपाला विक्री केंद्राचा उपक्रम देशात फक्त गोवा राज्यातच राबवला जात आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय.

अवश्य वाचा : ‘सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार’-मनोज जरांगे

गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा (Agriculture News)

गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील कृषीभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या शिष्टमंडळात कृषीभूषण अंकुश पडवळे यांच्यासोबत उपसरपंच प्रकाश भोसले, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन जयराम आलदर, दूध संस्थेचे चेअरमन भगवानराव चौगुले, माजी सरपंच संतोष वाले आदी सहभागी होते. सोलापूरच्या शेतकरी शिष्टमंडळाने फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत सविस्तर माहिती घेतली. शेतकरी शिष्टमंडळाने गोवा सरकारच्या गोव्यातील फळे व भाजीपाला २० विक्री केंद्रांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.

गोवा सरकारनं फळे आणि भाजीपाली विक्री केंद्र सुरु केली आहेत. हे देशासाठी आदर्श विक्री मॉडेल असल्याची माहिती कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी दिली. आता महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहेत, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गोवा सरकारला गरजेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला घेता येतील. याबाबतची बोलणी सकारात्मक झाल्याचे पडवळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here