Gopichand Padalkar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले,असं वक्तव्य भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. तसेच त्यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहाद कायद्यावरही (Love Jihad Law) मोठी मागणी केलीय. संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या नावाने लव्ह जिहाद कायदा करावा,अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. ते अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) बोलत होते.
नक्की वाचा : वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?
ओबीसींचे गेलेले आरक्षण शिंदे, फडणवीस यांनी टिकवले (Gopichand Padalkar)
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर हे म्हणाले की,मी आज काहीही मागणार नाही.मात्र आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे.ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
अवश्य वाचा : ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय’- माणिकराव कोकाटे
‘संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहाद कायदा करावा’ (Gopichand Padalkar)
तसेच, लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मोठी मागणी त्यांनी जाहीरपणे केली.
‘इतिहासकारांनी अहिल्यादेवींचा इतिहास लिहिला नाही’ (Gopichand Padalkar)
अहिल्यादेवी यांनी कोणत्या जातीसाठी नव्हे तर देशासाठी कार्य केले.मात्र इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लिहिला नाही. यशवंतराव होळकर,मल्हारराव होळकर यांचा इतिहास लिहिला गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी घेतली,असा इतिहास यावेळी पडळकर यांनी सांगितला. आज अहिल्यादेवी होळकर यांची अनेक चित्र तयार झालेत. केवळ हातात पिंड दिलेला फोटो नव्हे तर घोड्यावर, हातात तलवार घेतलेले फोटो समोर येतायत,असं मत यावेली पडळकर यांनी व्यक्त केले.