नगर : जयंत पाटील यांचे राजकारण संपत आले आहे. दिवा विझताना मोठा होता. तशी सध्या त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. ते मंगळवारी (ता. १०) कोल्हापूर येथील (Kolhapur) सभेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा,अशी मागणी करणाऱ्या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
नक्की वाचा : नोकरावर प्रेम,नवऱ्याचा गेम! सोनमनेच रचला राजाच्या हत्येचा कट
‘जयंतराव हा राजकारणातून संपलेला विषय’ (Gopichand Padalkar)
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरीयस वाटत नाही. ते जबाबदारीपासून का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. जयंतराव हा राजकारणातून संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे. जयंत पाटील हा अनुकंपा तत्त्वावर राजकारणात भरती झालेला कार्यकर्ता आहे. त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. कुठलाही मोठा प्रकल्प सांगलीसाठी आणला नाही. इतके वर्षे व्हीआयपी कॅबिनेट म्हणून ते राहिले होते. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येते. मात्र, टायर फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो तशी अवस्था जयंत पाटील यांच्याबाबत झाली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
अवश्य वाचा : ‘मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा’;वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!
‘रायगडावर धनगर समाजाला पक्की घर बांधून द्या’ (Gopichand Padalkar)
स्वराज्यामध्ये धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. रायगडावरती खूप मोठी जबाबदारी धनगर समाजावर असायची. सुईसारख्या वाटा शोधून दुश्मनावर हल्ला करायचा आणि त्या वाटा पुन्हा बुजवायच्या, शत्रूंची सर्व गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली जायची. इतकं मोठं योगदान असताना कुणाच्या डोळ्यात धनगर समाजाची घरे खुपतात माहिती नाही. तुमच्या साक्षीने धनगर समाजाला दिलेली नोटीस फाडून टाकतो. ही सगळी माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. रायगडावरील धनगर समाजाला पक्की घर देण्यासाठी मागणी करतोय, पुढच्या दोन ते तीन दिवसात आम्ही रायगडावर जातो. पुरातत्व विभागाने दिलेल्या नोटीस मागे घ्याव्यात,असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.