Harshvardhan Sapkal : अमित शहा (Amit Shah) यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मला पहा आणि फुल वहा या स्वरुपाचा होता,असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लगावला आहे. मुंबई तरंगली आहे. महायुतीचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. भाजपला उतरती कळा लागल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच महाराष्ट्राचे निर्णय अमित शाह घेत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) घेत नाहीत अशी टीका देखील सपकाळ यांनी केली.
नक्की वाचा :‘सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ’;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
‘महाराष्ट्र केसरी लढवणार माणूस गाव गाड्यात कुस्त्या लढतोय'(Harshvardhan Sapkal)
महाराष्ट्र केसरी लढवणार माणूस गाव गाड्यात कुस्त्या लढत आहे,असे म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. तसेच महाराष्ट्र अमित शाह चालवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कटपुतली आहेत. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मला पहा आणि फुल वहा या स्वरूपाचा असल्याचे सपकाळ म्हणाले. आज काँग्रेस पक्षाची तिरंगा रॅली आहे. त्याकरिता हर्षवर्धन सपकाळ नांदेडला आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अवश्य वाचा : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर बोलणारे लोक मूर्ख’- देवेंद्र फडणवीस