Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित

Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित

0
Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित
Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित

Hathras Stampede : नगर : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत (Hathras Stampede) १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून या सत्संगाचं आयोजन करणारे लोक आणि भोले बाबाविरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर न्यायालयाने (Court) या प्रकरणाची दखल घेत एसआयटी (SIT) चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

तब्बल १२० हून अधिक लोकांची चौकशी

एसयाटीच्या पथकाने तीन दिवसांचा तपास आणि तब्बल १२० हून अधिक लोकांच्या चौकशा केल्यानंतर एसआयटीने ३०० पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात दुर्घटनेची कारणं आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची नावं नमूद करण्यात आली आहेत. हा अहवाल हाती पडताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. सर्कल ऑफिसरसह, सिकंदरामाऊच्या तहसीलदारांचाही या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित
Hathras Stampede : हाथरस दुर्घटने प्रकरणी योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर, सहा अधिकारी निलंबित

अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

हजारो लोक एकाच वेळी धावल्याने चेंगरांचेंगरी (Hathras Stampede)

२ जुलै रोजी नारायण साकार उर्फ विश्व हरी उर्फ भोले बाबा या स्वयंघोषित धर्मगुरूने आणि त्याच्या अनुयायांनी हाथरस येथे सत्संगाचं आयोजन केलं होतं. स्वतः भोले बाबाने या सत्संगाच्या कार्यक्रमात प्रवचन दिलं. मात्र प्रवचन संपवून तो तिथून निघून जात असताना सत्संगाला आलेल्या भक्तांनी त्याला नमस्कार करण्यासाठी त्याच्या कारच्या दिशेने धाव घेतली. हजारो लोक एकाच वेळी त्याच्या कारच्या दिशेने धावू लागले आणि त्याच वेळी धक्काबुक्की आणि चेंगरांचेंगरी झाली. यात १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

एसआयटीच्या अहवालात काय म्हटलंय? (Hathras Stampede)

या प्रकरणाचा तपास करून एसआयटीने अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की सत्संगाचं आयोजन करणाऱ्या समितीच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अहवालातून एसआयटीने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सत्संगाला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. परंतु, आयोजकांनी केवळ ८०,००० लोकांसाठी परवानगी मागितली होती. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ८०,००० लोकांसाठी परवानगी देत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आयोजक आणि प्रशासकीय अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, या ३०० पानी अहवालात भोले बाबाचा नामोल्लेखही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर गेलं असून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here