Heavy Rain : नगर : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने (Rain) सर्वदूर हजेरी लावली तर काही भागात थैमान घातले आहे. त्यामुळे शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार (ता.२५) झालेल्या पावसाने अहिल्यानगर(Ahilyanagar), पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी तालुक्यात २६ ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rain) झाली.
अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!
पावसाची नोंद मिली मीटरमध्ये (Heavy Rain)
नगर तालुक्यातील नालेगाव मंडळात – १८.३ (मिली मीटर), केडगाव -४०, कापूरवाडी – ३८.३, भिंगार -७३.३, नागापूर ७५, जेऊर – ५३.५, चिचोंडी- ६६.३, चास- ९३, नेप्ती- ७२.८, पारनेर तालुक्यातील पारनेर -६८.३, सुपा- ७७, वाडेगव्हाण- ६२.५, भाळवणी- ९०.५ , निघोज -५९, टाकळी -५६.५ पळशी -३५.८, कान्हूर पठार -६०, पळवे- ६६ तर श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा ५८, काष्टी- ५४, मांडवगण- ३३ बेलवंडी -४१, पेंडगाव- ९४, चिंभळी- ३६, देवदैठण – ७६.८, कोळगाव- ३५, भाणंगाव- ८२.८, आढळगाव- ८२.८ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कर्जत तालुक्यात कर्जत -१०३, राशीन- ३०.५, भांबोरा- ८४.५, मिरजगाव मंडळात- २९, माही- ७२, कोंभळी- ७४.३, वालवड- १०३, खेड -१३.६, जामखेड तालुक्यात अरणगाव- ४१, नान्नज- ४७, साकत- २७.८, शेवगाव मंडळात शेवगाव-५४, भातकुडगाव ४८.८, ढोरजळगाव- ५६.८, दहिगावने- ४३, पाथर्डी मंडळातील पाथर्डी-४८, माणिक दौंडी-४८.८, करंजी- ६०.८, तिसगाव – ६२, मिरी- ६०.३, नेवासा तालुक्यातील कुकाणा -४४.५ , चांदा -३८ , घोडेगाव -४९, नेवासा- ३७, सोनई-६२.३ , वडाळा -३७.३, राहुरी -६४.८, सात्रळ- २५.५, टाकळीमिया -६४.८, ब्राह्मणी -६५, वांबोरी -३६.५, बारागाव नांदूर -६३.३ , संगमनेर तालुक्यात ३५, सामनापूर – ३९, अकोले -३७, समशेरपूर ४१, राजूर -३०, कोतुळ ४५.५, ब्राम्हणवाडा-४५.५, परिसरात या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तब्बल २६ मंडळात पावसाची नोंद झाली आहे. तर काही मंडळात ४५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.