Heavy Rain : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे १२४ घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. याशिवाय फळबागा, भाजीपाला, उन्हाळी पिके व चारा पिके मिळून तब्बल दोन हजार ९०० हेक्टर शेतीचे (Agricultural) मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने (Administration) व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
वाळकी मंडलात अतिवृष्टी
अहिल्यानगर तालुक्यातील चास आणि वाळकी मंडलात अतिवृष्टी झाली. खडकी, सारोळा कासार, अकोळनेर आणि वाळकी गावातील नदीकाठच्या शेतकर्यांना झोडपून काढलं. तालुक्यातील अनेक गावांत महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. केडगाव व वाळकी येथे प्रत्येकी १००.५ मिमी आणि चास येथे ११८.३ मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याने वालुंबा नदीला पूर आला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील ४५ गावे जलमय झाली होती.
अवश्य वाचा : पर्यावरण रक्षणासाठी विघटनशील प्लास्टिक हेच भविष्य : मुख्यमंत्री
शेतकर्यांसह सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान (Heavy Rain)
यामुळे शेकडो हेक्टर वरील शेती,त्यावरील फळबागा, तर कांद्याच्या अनेक वखारी वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे फक्त शेतकर्यांचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, वीज रोहित्र, तसेच रस्त्यावरील पूल अशा एकूण ६१ ठिकाणी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. काही भागांत अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, सर्व प्रभावित गावांत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच मदतीसाठी आवश्यक यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले.