Hindu Raksha Samiti : हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा

Hindu Raksha Samiti : हिंदू रक्षा कृती समितीच्यावतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा

0
Hindu Raksha Samiti : हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा
Hindu Raksha Samiti : हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा

Hindu Raksha Samiti : श्रीरामपूर: सरलापिठाचे महंत रामगिरीजी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज चौकात नामदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केले. वर्षभरानंतर त्यांच्या राजकीय सोयीसाठी छत्रपतींच्या पुतळ्याची अचानक जागा बदलून नेहरू मार्केट भाजी मंडई मध्ये पुन्हा भूमिपूजन केले. हा नामदार विखे यांनी हिंदू समाजाचा केलेला विश्वासघात असून श्रीरामपूर तालुक्यातील जनता हा विश्वासघात विसरणार नाही, असा अशी भावना हिंदू रक्षा कृती समितीचे (Hindu Raksha Samiti) निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी वक्त केली.

नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

छत्रपतींच्या पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेध

छत्रपतींच्या पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेधार्थ व छत्रपतींचा पुतळा श्री शिवाजी महाराज चौकातच व्हावा, या मागणीसाठी हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेचे अध्यक्षस्थानी सुदाम महाराज चौधरी होते तर या प्रसंगी आचार्य महेशजी व्यास, हिंदू जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरेगावकर, सेवालाल महाराज,ऋषिकेश महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष संजयजी पांडे, सुनील खपके,अशोक साळुंखे, सुरेश आसने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष

अन्यथा आंदोलनाच्या मार्गाने लढावे लागेल (Hindu Raksha Samiti)

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकाम रेषेच्या नियमाची अडचण आहे, असे सांगतात मग चाळीसगाव आणि तासगाव या तालुक्याच्या गावांमध्ये भर चौकामध्ये नॅशनल हायवेवर कायदेशीररित्या परवानगी घेऊन पुतळ्यांची प्रतिष्ठापना कशी झाली. वरील गावांमध्ये नॅशनल हायवे डी नोटीफाय करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकामरेषेच्या नियमावर मार्ग काढण्यात आला व पुतळ्यांच्या प्रतिष्ठापना मोठ्या दिमाखात झाल्या. श्रीरामपूरच्या शिवाजी महाराज चौकातही त्याच पद्धतीने मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाऊ शकतो. मात्र, पुतळा शिवाजी चौकात बसवायचा नाही असाच निर्णय असेल तर हिंदू समाजाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने लढावे लागेल, असे चित्ते यांनी यावेळी स्पष्ट केले.