Human Rights : मानव अधिकार हे माणसाला मिळालेली कवचकुंडले : युवराज 

Human Rights : मानव अधिकार हे माणसाला मिळालेली कवचकुंडले : युवराज 

0
Human Rights : मानव अधिकार हे माणसाला मिळालेली कवचकुंडले : युवराज 
Human Rights : मानव अधिकार हे माणसाला मिळालेली कवचकुंडले : युवराज 

Human Rights : पारनेर: मानवाधिकार (Human Rights) हे माणसाचे मुलभूत आणि जन्मतः मिळालेले अधिकार असून ते आपल्या अधिकाराचे संरक्षक असून ती आपली कवचकुंडले आहेत, असे विचार राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्लीचे आयपीएस अधिकारी (IPS Officer) युवराज यांनी प्रकट केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर व राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्ली (New Delhi) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय मानव अधिकार (National Human Rights) प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

मानवाधिकाराविषयी सखोलपणे दिली माहिती

याप्रसंगी बोलताना त्यांनी भारतात राहणाऱ्या विविध जाती व धर्मांच्या लोकांना विशेषत्वाने मानवाधिकाराची ओळख असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. त्यांनी शिक्षण विषयक मानवाधिकार व स्वातंत्र्य विषयक मानवाधिकाराविषयी सखोलपणे माहिती देऊन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची भूमिका व कार्याची ओळख करून दिली. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते, आत्मविश्वास असतो फक्त त्यांना दिशा देण्याची आवश्यकता असते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम येथील प्राध्यापक वृंद मोठ्या उत्साहाने करत आहे, ही खूप अभिमानाची आणि आनंदाची अशी बाब आहे, असे ते म्हणाले. 

अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

१८० विद्यार्थ्यांचा आपला सक्रिय सहभाग (Human Rights)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार राऊत यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिलीप ठुबे होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर विभागातील एकूण १८० विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा महिला व बाल कल्याण व बाल सुधार समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा येवले, पारनेर पोलीस स्टेशनचे पी.आ.य समीर बारवकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. रविंद्र देशमुख, शाखा समन्वयक डॉ.दिपक सोनटक्के, शाखा संयोजक डॉ. रघुनाथ नजन उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शुभदा आर्डे यांनी केले. आभार डॉ. हनुमंत गायकवाड यांनी मानले.