Hunger Strike : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने (Illegal Slaughterhouses) बंद करण्यासाठी तसेच मशिदीवरील भोंगे (Loudspeaker Mosque) उतरविण्यासाठी मढी येथील श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, कानिफनाथ आखाड्यातील साधू, सकल हिंदू समाज (Hindu Society), तसेच गोरक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत कत्तलखाने बंद होत नाही तसेच मशिदीवरील भोंगे उतरवीत नाही, तोपर्यंत उपोषण (Hunger Strike) सोडणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्यांचा सरकारला संतप्त सवाल
आंदोलनात सहभाग
यावेळी मढी गावचे सरपंच संजय मरकड, कानिफनाथ आखाड्याचे सुखवीर नाथजी महाराज, सुंदरनाथजी महाराज, सोपानाथ महाराज कापसे, दत्तसेवा संस्थांनाचे कालिदास महाराज घोडके, हनुमान सेवा संस्थांनाचे सोमनाथ महाराज गिरी, उत्तम मरकड, बाळासाहेब मरकड, शरद कुटे, भानुदास मरकड, संकेत मरकड, विष्णू मरकड, मारुती मरकड, वृद्धेशवर वारकरी संस्थांनाचे सूरज महाराज आदमने, प्रतीक औटी, किरण अकोलकर, कुणाल भंडारी, सागर निकम, ओंकार नजन, राहुल मेहेत्रे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल होत असल्याचा आरोप (Hunger Strike)
राज्यासह जिल्ह्यात गोहत्याबंदी असून ही अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गोवंशीय जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. गायी ही गोमाता आहे. हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या गोवंशीय जनावरांची कत्तल सर्रास होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने बंद करावेत तसेच मशिदीवरील भोंगे उतरवावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच ज्या पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरांची कत्तल झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.