ICC New Rules : क्रिकेट हा अनेक जणांचा आवडीचा खेळ आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International Cricket) अनेक नियमांमध्ये बदल (Rule Change) झालेले पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अनेक नवीन नियम (ICC New Rules) मंजूर केले आहेत. या बदलांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ व्या षटकापासून केवळ एकच चेंडू वापरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयसीसीने कसोटी सामन्यांमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केलाय. तर कॅचच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेटमधील नियम येत्या २ जुलैपासून लागू होणार आहे.
नक्की वाचा : अलकनंदा नदीत बस कोसळुन भीषण अपघात;दोन जणांचा मृत्यू
आयसीसीने कोणते नियम लागू केलेत ? (ICC New Rules)
१. कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक :
टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केल्यानंतर एक वर्षाने आयसीसीने आता कसोटीतही तो लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटीत स्लो ओव्हर रेट ही एक मोठी समस्या होती. आता आयसीसीच्या नवीन नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढील षटक सुरू करावे लागेल. जर एका मिनिटात पुढील षटक सुरू झालं नाही तर त्यांना पंचांकडून दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतरही जर १ मिनिटात षटक सुरू झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघाला पाच धावांचा दंड आकारला जाईल. ८० षटकांनंतर पुन्हा स्टॉप क्लॉक पुन्हा सुरू होईल. आयसीसीसीचा हा नियम २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत लागू करण्यात आला आहे.
२. चेंडूवर लाळेचा वापर केला तर चेंडू बदलला जाणार नाही :
आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे.मात्र मोठा बदल असा आहे की, जर पंचांना चेंडूवर लाळ लावल्याचं पाहायला मिळालं तर तो चेंडू बदलला जाणार नाही. संघांनी चेंडू बदलण्यासाठी जाणूनबुजून चेंडूवर लाळेचा वापर करू नये, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता पंच फक्त तेव्हाच चेंडू बदलतील जेव्हा चेंडूचा आकार बदललेला असेल. जर चेंडू खूप ओला असेल किंवा त्यात अतिरिक्त चमक असेल. तर पंच त्यांच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेतील. जर पंचांना असं वाटत असेल की, लाळेच्या वापरामुळे चेंडूमध्ये फारसा बदल होणार नाही, तर चेंडू बदलला जाणार नाही.
३. डीआरएस प्रोटोकॉलमध्ये बदल :
आयसीसीने आता डीआरएस प्रोटोकॉलमध्येही मोठा बदल केलाय. समजा, एखाद्या फलंदाजाला झेलबाद दिलं गेलं आणि तो खेळाडू जर रिव्यूची मागणी करत असेल. तर अल्ट्राएजला दाखवलं जात की, चेंडू बॅटला स्पर्श न करता पॅडवर आदळला. झेलबाद रद्द झाल्यानंतर, टीव्ही अंपायर मग दुसऱ्या डिसमिसल मोडची तपासणी करतात. आता नवीन नियमानुसार,जेव्हा एलबीडब्ल्यूसाठी बॉल ट्रॅकिंग ग्राफिक दाखवले जाईल, जर फलंदाज इथे बाद झाल्याचं दिसलं तर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागणार आहे.
४. फलंदाज बाद झाल्याचे २ अपील
आयसीसीने पंच आणि खेळाडूंच्या रिव्ह्यूच्या प्रक्रियेतही मोठा बदल केला आहे. पूर्वी टीव्ही पंच पहिल्यांदा पंच आणि नंतर खेळाडूंचा रिव्यू विचारात घेत असत परंतु, नवीन नियमानुसार जर फलंदाज आधीच बाद झाले असेल तर चेंडू डेड होईल. इतर रिव्यूज अजिबात तपासले जाणार नाहीत. उदाहरणार्थ, जर एलबीडब्ल्यू आणि रन आउटसाठी अपील असेल, तर टीव्ही अंपायर प्रथम एलबीडब्ल्यू तपासतील कारण एलबीडब्ल्यू आधी झालं आणि मग रनआऊटचं अपील झालंय. जर फलंदाज आउट झाला असेल तर चेंडू तिथेच डेड होईल, असं यावेळी सांगण्यात आले आहे.
५. झेल टिपण्याच्या बाबतीत मोठा बदल:
आयसीसीने कॅचबाबतचा एक मोठा नियम बदलला आहे. म्हणजे जर फील्ड पंचांना कॅच बरोबर पकडला गेला आहे की नाही हे माहित नसेल,पण टीव्ही पंच सांगतात की तो नो बॉल होता. याआधी नो-बॉल सिग्नल असताना कॅचची निष्पक्षता तपासली जात नव्हती. मात्र नवीन नियमांप्रमाणे आता तिसरे पंच झेलबाद तपासतील. जर कॅच योग्य असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला नो-बॉलसाठी फक्त एक अतिरिक्त धाव मिळेल. मात्र जर झेल बरोबर नसेल तर फलंदाजांनी केलेल्या धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जातील.
६. शॉर्ट रनवर दंड :
आयसीसीने शॉर्ट रनबाबत देखील मोठा निर्णय लागू केला आहे. यापूर्वी जाणूनबुजून शॉर्ट रन घेतल्याबद्दल पाच धावांचा दंड आकारला जात होता, मात्र नवीन नियमांनुसार, जर फलंदाजाने जादा धाव चोरण्यासाठी जाणूनबुजून धाव पूर्ण केली नाही, तर पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विचारतील की, त्यांना कोणता फलंदाज स्ट्राईकवर असावा असं वाटतंय. याशिवाय, शॉर्ट रन घेणाऱ्या फलंदाजाच्या संघाला निश्चितच पाच धावांचा दंड आकारला जाईल. पण, हे तेव्हाच होईल जेव्हा पंचांना असं वाटेल की, फलंदाजाचा हेतू पंचांना फसवणे किंवा धावा काढणे हा नव्हता.
अवश्य वाचा : ‘मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असेल’- देवेंद्र फडणवीस