ICC Women Cricket WorldCup:महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंना मिळणार इनाम 

0
ICC Women Cricket WorldCup:महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंना मिळणार इनाम 
ICC Women Cricket WorldCup:महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंना मिळणार इनाम 

नगर : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women Cricket Worldcup) जिंकून इतिहास रचला आहे. या यशानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संघाचे औपचारिक अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंना रोख पारितोषिकाने गौरवण्यात (Honored with a cash prize) येणार आहे.

नक्की वाचा: अखेर राज्यातील नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

महाराष्ट्रातील खेळाडूंना मिळणार रोख पारितोषिक (ICC Women Cricket WorldCup)

महाराष्ट्रातील स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव या तिन्ही खेळाडूंनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने त्यांना रोख पारितोषिकाने गौरवण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-kyc करण्यासाठी ‘ती’ अट शिथिल  

“टीम मुंबईत आल्यावर त्यांना सन्मान होईल”- देवेंद्र फडणवीस   (ICC Women Cricket WorldCup)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभरात उंचावले आहे. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळात अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आपल्या धोरणानुसार महाराष्ट्रातील तिन्ही मुलींना राज्य सरकारकडून रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यांच्या सन्मानाचा निर्णय घेतला असून, ही संपूर्ण टीम जेव्हा मुंबईत येईल, तेव्हा राज्य सरकारकडून त्यांचा औपचारिक सत्कार केला जाईल.”

महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या या यशामुळे राज्यातील अनेक तरुणी क्रिकेटकडे नव्या उत्साहाने पाहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न राहता, राज्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. या सन्मानामुळे भविष्यात महिला क्रिकेटपटूंना आपलं कौशल्य जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.