Ind vs Aus 3rd ODI : हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) जोडीने पुन्हा एकदा भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सामन्यात दणदणीत विजय (Victory in the ODI match) मिळवून दिला आहे. रोहित आणि विराटने १६८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने भारताला विजयाचं मानकरी बनवले आहे. रोहित आणि विराटने शेवटपर्यंत नाबाद राहत त्यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मात्र ऑस्ट्रेलियाने २-१ च्या फरकाने भारताविरूद्धची वनडे मालिका आपल्या नावे केली आहे.
नक्की वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी ९ विकेट्सने केला पराभव (Ind vs Aus 3rd ODI)
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी ९ विकेट्सने पराभव केला.यामध्ये रोहित शर्माने शानदार शतक आणि विराट कोहलीने दमदार अर्धशतकासह सर्वात मोठी भूमिका बजावली. दोघांनी मिळून १६८ धावांची भागीदारी करून संघाला २३७ धावांचं लक्ष्य गाठण्यास मदत केली. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या आहेत.
अवश्य वाचा: राज्यावर पुन्हा पावसाचे संकट; २० ते २५ ऑक्टोबरला पावसाचा इशारा
रोहित- विराट कोहलीची तुफान खेळी (Ind vs Aus 3rd ODI)
रोहित शर्माने १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ७४ धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिल २६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २३७ धावांचे आव्हान दिले होते. रोहित-विराटच्या भागीदारीसह भारताने ३८.३ षटकांत २३७ धावा करत सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी ६१ धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर अक्षर पटेलने फिरकीच्या जोरावर विकेट घेतली. त्यानंतर, मॅथ्यू शॉर्ट आणि मॅट रेनशॉ ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाचे नेतृत्व करत असताना, हर्षित आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सलग धक्के दिले. यासह ऑस्ट्रेलिया संघ ४७ षटकांत फक्त २३७ धावांवर गारद झाला.



