India-Pakistan War : राहुरीत तिरंगा रॅली; विंग कमांडर विवेकानंद नलगे यांची उपस्थिती

India-Pakistan War : राहुरीत तिरंगा रॅली; विंग कमांडर विवेकानंद नलगे यांची उपस्थिती

0
India-Pakistan War : राहुरीत तिरंगा रॅली; विंग कमांडर विवेकानंद नलगे यांची उपस्थिती
India-Pakistan War : राहुरीत तिरंगा रॅली; विंग कमांडर विवेकानंद नलगे यांची उपस्थिती

India-Pakistan War : राहुरी: पाकिस्तानने भारतावर (India-Pakistan War) केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दलाने (Indian Army) जशास तसे उत्तर देत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वीरित्या पार पाडत शत्रू राष्ट्रावर हल्ला करत दहशतवादी (Terrorists) अड्डे उद्ध्वस्त केले. देशाप्रती तथा सैन्या प्रती सन्मानाची भावना वाढवण्यासाठी राहुरी शहरामध्ये विजयी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात चिंब होत जवानाप्रती राहुरीकरांनी आदर व्यक्त केला.

नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत

भर पावसात तिरंगा यात्रेचा समारोप

देशाच्या सीमेवर उन, वारा, पाऊस, थंडीत जवान सीमेवर खडे असतात तर आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी पावसात भिजलो तरी चिंब होण्याची तयारी राहुरीकरांनी दर्शविली. भर पावसात तिरंगा यात्रेचा समारोप नव्यापेठेत झाला. या यात्रेत ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले भारतीय वायुसेनेचे योद्धा विंक कमांडर, राहुरी तालुक्यातील चिंचोलीचे भूमिपुत्र विवेकानंद अनिल नलगे हे सहभागी झाले होते. यावेळी विंग कमांडर विवेकानंद नलगे यांनी ऑपरेशन सिंदूर मधील नवीन तरुणांना शौर्य क्षणांची माहिती देत तरुणांना भारतीय सैन्य दलात येण्याचे आवाहन केले.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

सेवानिवृत्त मेजर व नागरिक उपस्थित (India-Pakistan War)

याप्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच राहुरी तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त मेजर व नागरिक उपस्थित होते. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीने विंग कमांडर विवेकानंद नलगे तसेच उपस्थित तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान केला. आमदार शिवाजी कर्डिले यावेळी म्हणाले, देशाच्या सीमेवर जवान तैनात आहेत, म्हणून देशातील जनता सुरक्षित आहे. जवानांना पाठिंबा दर्शविण्यासाठी देशभर तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. त्यांना जनतेचा सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी आरडगाव येथील तक्षज्ञ महाविद्यालयाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर पर नाट्याचे सादरीकरण केले. तर कर्मवीर अकॅडमीचे विद्यार्थिनीने देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या तिरंगा रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खरेदी विक्री संघापासून तिरंगा यात्रा सुरू झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून तिचा समारोप नव्या पेठेत झाला.