Kidnapping : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील हातवळण येथे २५ ऑक्टोबर रोजी तरुणाच्या अपहरण (Kidnapping) प्रकरणात पोलीस (Police) तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. तो स्वताच लपून बसला आणि त्याच्या पत्नीने त्याच्या अपहरणाची फिर्याद दिली. त्यामुळे खोटी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी ‘त्या’ तरुणासह त्याची पत्नी, वडील, सासू, सासरे यांच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत अपहरणाच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम महादेव यादव, त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव, वडील महादेव सावळेराव यादव (तिघे रा. हातवळण, ता. नगर), सासरे रामदास उध्दव सोनसळे, सासु सिंधुबाई रामदास सोनसळे (दोघे रा.शेंडी, ता. नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
स्वतःच बसला होता लपून (Kidnapping)
यातील सुमन यादव हिने २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात आपले पती तुकाराम महादेव यादव यांचे गणेश कवडे, माऊली पठारे, सुनील दिलीप पठारे, अक्षय भंडारे (सर्व रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलुन नेऊन अपहरण केले आहे. तसेच सलून दुकानाची तोडफोड केली आहे, अशी फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ हे करत होते. या तपासादरम्यान त्यांना तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झालेले नव्हते. तो स्वतःच लपून बसला होता. त्याच्या पत्नी, वडील, सासू सासरे यांनी पोलिसांना खोटी माहिती दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे अपहरण झाल्याचा बनवा केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



