Laxman Hake:’एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका’;लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

0
Laxman Hake:'एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका';लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Laxman Hake:'एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका';लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून (CM Eknath Shinde) आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. काल रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलं उत्तर दिले आहे. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांच्या शिंगावर घेणार,असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

नक्की वाचा : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस;पुण्याला रेड अलर्ट तर नगरमध्येही जोरदार बरसणार

लक्ष्मण हाकेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा (Laxman Hake)

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, रात्री एकच्या आसपास चार तरुण आले आणि दोन तरुणांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे रात्रीच्या घटनेने सिद्ध झाले आहे,असं त्यांनी सांगितले. लक्ष्मण हाके यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर देखील निशाणा साधला आहे. हाके म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचे भ्रमण करा. वर्षानुवर्षे तुम्ही मोठमोठी पदे भोगली आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? ओबीसी भटके कुठे कुठल्या भागात राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? राहुल गांधीला विनंती आहे की,असली दरबारी माणसं बाहेर काढा, नाहीतर तुमचा पक्ष संस्थांनांपुरता शिल्लक असेल.

अवश्य वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका;लावणीवर चाहते फिदा  

लक्ष्मण हाकेंची संभाजीराजे छत्रपतींवर टीका  (Laxman Hake)

लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर देखील टीका केली. ते म्हणाले की, एकदा जनतेला कळू द्या राजा किती लायकीचा आहे. राजा १२ -१३ कोटी जनतेचा पाहिजे. वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे. कोण राजा कुठला राजा, आम्ही फक्त त्यांना राजा म्हणायचे त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का? या जनतेसाठी आपण कसे वागलं पाहिजे.

राजेश टोपेंवर बोलताना हाके म्हणाले की, सेक्युलरवादी आहेत. शरद पवारांचे चेले आहेत. शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील? मला मुंबईत राजेश टोपे भेटले होते ते मला म्हणाले की, ते सेक्युलर वादी आहे. सर्व आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री यांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न व आंदोलने दिसतात. बाकी ओबीसी म्हणजे त्यांच्यासाठी शोषित आणि वंचित असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here