Manoj Jarange:’मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण थांबवलं असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

0
Manoj Jarange:'मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही'- मनोज जरांगे
Manoj Jarange:'मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही'- मनोज जरांगे

Manoj Jarange : मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात भूमीपूजन करुन शिवरायांचे स्मारक होत नाही,असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोंदींवर निशाणा साधला. छत्रपतींचा महानाट्य दाखवलं म्हणजे गुन्हा केला का? असा सवाल त्यांनी केलाय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत उपोषण थांबवलं असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २० जुलैपासून आमरण उपोषणाला जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरुवात केली होती. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असतानाच त्यांनी हे उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

नक्की वाचा : अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनोज जरांगे यांची टीका (Manoj Jarange)

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींना घेरल्याचं पाहायला मिळालं. सत्ता आणायला मोदींना छत्रपती लागतात मात्र  समुद्रातच स्मारक होत नाही. भूमीपूजन करायला जमतं असं म्हणत छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला तो पैसा भरता येत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात (Manoj Jarange)

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचा आयोजन केलं होतं. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी पुण्यातच जरांगेविरुद्ध गुन्हा ही दाखल झालाय. दरम्यान, एकदा पीक विम्याचे पैसे मी म्हातार्‍याला न विचारता नाटकाला दिले होते,असं म्हणत छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत.असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

अवश्य वाचा : करदात्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा;करामध्ये ‘इतक्या’लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

बीडच्या नेत्याचं पण तसेच केलं त्यांच्याच बापाने भाजप वाढवली पण त्यांनाच पाय खाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी संपवलं, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात. एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here