Manoj Jarange: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

अजय बारस्कर महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत टीकास्त्र सोडलं आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केलेत.

0
Ajay Maharaj Baraskar
Ajay Maharaj Baraskar

नगर :मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. त्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी जरांगे यांनी मटण खाल्लं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केले’ असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हा घणाघात केला.

नक्की वाचा : राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व नकोच; शिंदे गटातील नेत्यांचा विरोध

अजय महाराज बारस्कर काय म्हणाले? (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं आंदोलन निवडणुकीपर्यंत कसं भरकटवल यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे. मला काही लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही एक महिनाभर शांत रहा, त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या, म्हणून मी शांत होतो. जरांगे यांच्यावर विश्वास होता. म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला. पण आता अश्या काही घटना घडल्या ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला. परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते. त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याच रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं बारस्कर यावेळी म्हणालेत.  

‘जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी नव्हतीच’ – बारस्कर (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्याने जे काही सुरु केलं त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरु आहे, असा आरोप बारस्कर यांनी केला.

बारस्कर पुढे म्हणाले की, जरांगे पाटील लोकांना भ्रमित करतोय. दिल्लीत अरविंद केजरीवाल चौकशीला घाबरले नाहीत, तुम्ही कशाला घाबरताय. हा दहावी बारावी छाप, पास झाला की नापास माहित नाही. पण याने कसलही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवलं. लोकसभेत आपलं काही गुंतल नाही. आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे अस ते म्हणाले. खरच अस आहे का ? लोकसभेचा काहीच फायदा नाही का ? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगे ने सांगावं. वाशीम जिल्ह्यातील एक भगिनी आहे. ती नायब तहसीलदार झाली होती पण कुणबी प्रमाणपत्रामुळे ती कलेक्टर झाली अस भ्रामक विधान त्याने कालच्या सभेत केलं. लोकांना भ्रमित तो करतोय,असा आरोप बारसकरांनी केला. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो ते सांग आम्हाला. बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो की आणखी कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो, असा सवालही त्यांनी विचारला.

अवश्य वाचा : घरच्या मैदानावर आरसीबीचा पंजाबवर विजय;दिनेश कार्तिक ठरला गेमचेंजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here