नगर : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde)आणि वाल्मिक कराड (Valmik Karad) निवडणुकीपूर्वी भेटायला आले होते,असं सांगितलं आहे.आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं.
नक्की वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य
धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?(Manoj Jarange)
धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. त्याआधी आठ दिवसांपासून फोन येत होते. रात्री दोन वाजता आले,सोबत वाल्मिक कराड होता. मी झोपलो होतो ते आत आले. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हार्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले,अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. दरम्यान,आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे,आरोपींना लपवत आहे. यांच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण यातांना भोगल्या या टोळीमुळे,असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.
अवश्य वाचा : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री;केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पात घोषणा
नामदेव शास्त्रींंबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?(Manoj Jarange)
महंत नामदेवशास्त्री यांच्याबद्दल बोलताना जरांगे यांनी सांगितलं की, नामदेव शास्त्री यांचं जे बोलायचं आहे ते बोलून झालं आहे, या टोळीने दाखवलं किती जातीयवाद असतो.असे जातीयवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे,पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही,करून घेणारी टोळी आहे.स्वतःसाठी देवधर्म कळेना. काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला. आता लोक व्यक्त होत आहे,असं मनोज जरांगे म्हणाले. आमचा विनाकारण संयम ढळला तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने भयंकर आंदोलन करावं लागेल,असा संतप्त इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.