Manoj Jarange:’सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार’-मनोज जरांगे

0
Manoj Jarange:'सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार'-मनोज जरांगे
Manoj Jarange:'सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार'-मनोज जरांगे

Manoj jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील,असे वक्तव्य नोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. ते सोमवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नक्की वाचा : माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट,’एक डाव भुताचा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करत असून ही मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली आणखी एक संधी आहे. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही राजकारण करू नये,असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होतं. आता तुम्ही या अगर येऊ नका,आपण आपली प्रक्रिया राबवत असतो. कोणी आले म्हणून आंदोलन होत नसते,असं देखील त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

‘निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही’ (Manoj Jarange)

आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा – जरांगे (Manoj Jarange)

राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत,असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी भाष्य करताना म्हटले की, सरकारने केलेली गोष्ट चांगली आहे. त्यांची मागणी आजची नाही. त्यांच्या मुलांना आणखी फायदा होईल. त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून एसटीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. सर्व बांधवांनी ताकदीने पंढरपूरच्या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here